मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG
महान व्यक्ती (special person) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महान व्यक्ती (special person) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

पद्मभूषण ताराबाई मोडक..

                                             


     *बालशिक्षणाच्या अध्वर्यू* 

   *पद्मभूषण ताराबाई मोडक*


*जन्म: १९ एप्रिल १८९२*

             (इंदूर, भारत)

*मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३*

धर्म : हिंदू

वडील : सदाशिव पांडुरंग केळकर

आई : उमाबाई सदाशिव केळकर

पती : के. व्ही. मोडक


               ह्या एक मराठी भाषिक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.


🤱🏻 *जन्म आणि बालपण*

             ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते.. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.


💁  *चरित्र*

    केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते.

                 याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९०८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९०९साली ताराबाई मॅट्रिक झाल्या.

            ताराबाई मो?  प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १०१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत.

            प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता.

            कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला. के.व्ही. हे एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही. यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के. व्ही. मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. के.व्ही. त्या वेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. के.व्ही. आणि ताराबाई यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.

            १९१५साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे १९१८पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. १९२०मध्ये त्यांना मुलगी झाली.

         पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा आणि अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे, त्या काळात ताराबईंनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा-होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते.

            पण ताराबाईंना स्वावलंबी होण्यासाठीची संधी लवकरच चालून आली (१९२१). राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्यपदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. प्राचार्यपदाच्या कामात व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनी बडोदा, अहमदाबाद येथील ट्रेनिंग कॉलेजना भेट देऊन व्यवस्थापनाचे तंत्रही आत्मसात केले. ताराबाईंनी ही नोकरी जेमतेम दोन वर्षे केली. या वेळी त्यांची नोकरी सोडायला कारण होती त्यांची मुलगी प्रभा! तिच्या त्यांच्या मुलीच्या, प्रभाच्या भविष्याच्या चिंतेखातर, तिची कुचंबणा लक्षात घेऊन ताराबाईंनी राजकोटची नोकरी सोडली. कॉलेजात नोकरीत असताना ताराबाईंनी मानसशास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली.

                  याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षणप्रयोगांविषयी वाचले आणि त्या सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वत: उच्चशिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या.

          गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण ६ व्याt वर्षापासून सुरू होत होते, त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या या प्रयत्नाकडे निव्वळ ‘फॅड’ म्हणून बघणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. गिजुभाईंना त्यामुळेच ताराबाई गुरुस्थानी मानत आल्या. त्यांच्याकडूनच त्यांनी बालशिक्षणाची संथा घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात मनापासून सामील झाल्या.

        भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती ताराबाईंच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी संमेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. ताराबाई भावनगर विषयी म्हणतात, ‘तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा आणि जीवनकार्य गवसले’.

          ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसोरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केवळ केला असे नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.

      बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!

       खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत. गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले.


🏢 *शाळा*

                पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. इथे येऊन त्यांना आपल्या बालशिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. कारण तोपर्यंत बालशिक्षण आणि ताराबाई दोन्हीही महाराष्ट्राला नवखे होते. शिशुविहारची स्थापना त्यांनी इ.स. १९३६ मध्ये केली आणि जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. शिशुविहार आणि बालअध्यापक विद्यालय यांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही त्यांनी व्यवस्थित करून ठेवले. पुढे पुन्हा खेड्यात जाऊन पूर्णवेळ बालशिक्षणाला वाहून घेण्याची भावना मूळ धरू लागली. त्यासाठी त्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला वास्तव्यास आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या अनुताई वाघ होत्या. बोर्डीला आल्या तेव्हा ताराबाईंच्या आयुष्याची मध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती आणि बालशिक्षणातही त्या मुरल्या होत्या. अनुताईंचीमात्र ही सुरुवात होती.

         इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. बोर्डी आणि कोसबाड इथल्या आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या वास्तव्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या शिक्षणाचा डोलारा कसा उभा राहिला हा इतिहास ग्रंथबद्ध आहे. गिजुभाईंना जशा त्यांच्या आदर्श सहकारी म्हणून ताराबाई मिळाल्या तशाच ताराबाईंना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रत्येक प्रयोगात सर्वस्व ओतून काम करणाऱ्या अनुताई मिळाल्या. या दोघींनी हरिजन वाड्यापासून सुरू केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला.


🏅 *पुरस्कार*

           ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला

          शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.


🪔 *निधन*

               ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडले.

           ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.


🏩 *दादरचे शिशुविहार*

इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.

             ' बालदेवो भव ' हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत, शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास मुभा देण्यात येते. मुलांना डबा, पाटीदप्तर, वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.

                 शाळेच्या इमारतीची रचनाही मुलांचा विचार करूनच केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोकळेपणाने फिरता येईल असे मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात ३० मुलांसाठी एक प्रशिक्षित, प्रेमळ व मुलांचे मन जाणणारी शिक्षिका आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. आनंदायी वातावरणात खेळाद्वारे मुले येथे हसत खेळत शिक्षण घेत असतात. त्यांना शाळेचीही गोडी वाटू लागते. ती चटकन् रमतात.

               शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरस्त हे लक्षात घेऊन मुलांची शारीरिक वाढ योग्य संतुलित होण्यासाठी वातावरणात मुलांच्या वयानुसार योग्य उंचीची झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम, डबलबार, सीसॉ इत्यादी साधने आहेत. मुलांना रोज निराळा सकस पौष्टिक आहार दिला जातो.

            लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे भातुकली. मुलांच्या भावनिक विकासात त्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन बाहुलीघराची योजना आहे. त्यासाठी मुलांच्या उंचीचेच खास कपाट बनवले आहे. वाळूच्या हौदात खेळताना लाडू, डोंगर, बोगदा, किल्ला करतात. येथे वाळू स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते.

        मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना भाजी चिरणे, किसणे, निवडणे, कुटणे, पीठ चाळणे, दळणे अशी कामे करायला हवी असतात. त्यांच्या वयाचा व शारीरिक कुवतीचा विचार करून लहानसे जाते, खलबत्ता, चाळणी, कमी धारेची सुरी असे देऊन ती कामे करायला देता येतात. आजपर्यंत एकाही मुलाला अशी कामे करताना इजा झालेली नाही. या साधनांवर खेळत असताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप शिकवता येते. मुले स्वावलंबी व्हावी म्हणून नाडी घालणे, बटणे लावणे, वेणी घालणे, पावडर लावणे इ. व्यवसाय दिले जातात.

      कोणतेही ज्ञान ग्रहण करायचे तर त्यासाठी ज्ञानेंदियांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी रंग, वास, चव, आकार, स्पर्श, आवाज या संवेदनांसाठी निरनिराळी साधने आहेत. कै. ताराबाई मोडक व शिक्षणतज्ज्ञ कै. शेष नामले यांनी मॅडम मॉन्टेसरीच्या साधनांवर आधारित भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरून साधनांची निर्मिती केली. प्रत्यक्ष फळे, फुले, धान्य, कागद, कापड, विविध रंगांच्या बाटल्या, खोकी इत्यादींचा उपयोग करून रंग, आकार, वास, चव यासाठी वेळोवेळी नावीन्यपूर्ण साधने बनवून आजचे शिक्षकही त्यात भर घालीत आहेत. बालमंदिरातल्या विविध साधनांवरील खेळांमधून बालकांचा बौद्धिक विकास योजनापूर्वक विकसित केला जातो.

               आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी साधने देऊन मुलांच्या जिज्ञासावृत्तीला खतपाणी घातले जाते. भिंगातून किड्याचे निरीक्षण करणे, लोहचुंबक विविध वस्तूंना लावून पहाणे, साबणाचे फुगे उडवणे इ. खेळून प्रत्यक्ष अनुभव घेतात. वर्गात कोणत्या साधनांवर खेळायचे याचे मुलांना स्वातंत्र्य असते. जोडीदाराबरोबर सहकाराने खेळणे, इतर मुले खेळत असताना पहाणे इ. क्रिया करताना मुलांमध्ये स्वयंशिस्त येते, संयमाची जाणीव येते व सामाजिकतेची जबाबदारी समजते.

   मुलांना श्रवण, भाषण-संभाषण ही कौशल्ये येण्यासाठी आमच्या शिशू विहारमध्ये रोजच बडबडगीते, बालगीते, समरगीते, भजन इ. गाण्याचे प्रकार ऐकवले जातात. मनोरंजन व भावनिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. अनौपचारिक गप्पा, सण व भोवती घडणार्‍या घटनांवर गप्पागोष्टी करणे, सहल, नाट्य, बाहुलीनाट्य असे अपक्रम घेतले जातात. गप्पा मारणे हे तर मुलांच्या आवडीचेच. त्यातूनच आपले विचार योग्य शब्दात मांडणे , सुसंगत बोलणे मुले शिकतात.

                मुलांबरोबर गप्पागोष्टी करणे ही बालशिक्षणाने प्राथमिक शिक्षणाला दिलेली देणगी आहे. प्राथमिक शिक्षणातील परिपाठात याचा उपयोग करून घेतला जातो. प्राणी, पक्षी, वाहने, फळे, फुले, भाज्या, वनस्पतींचे अवयव, फळांचे भाग, ब्रश, पूजेचे सामान, वाद्ये इ.चा परिचय-पाठ देताना प्रत्येक वस्तु दाखवून ओळख दिल्यामुळे ते ज्ञान कायम टिकते. तसेच शब्दांचे अर्थ समजतात, शब्दसंग्रह वाढतो. वर्णन करून गोष्ट सांगणे, चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे असे विविध उपक्रम घेतले जातात. पाच वर्षांची मुले चित्रावरून गोष्ट तयार करू शकतात. मुलांना व्याकरणशुद्ध बोलता यावे म्हणून व्याकरणावरील मौखिक खेळ घेतले जातात. एकवचन-अनेकवचन, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय वगैरे मौखिक खेळ खेळाच्या स्वरूपात घेतले जातात. या खेळांसाठी मुलांच्या दैनंदिन परिचयाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो.

              अक्षरओळख देण्यापूर्वी चित्र किंवा वस्तूमधील साम्य ओळखणे, भेद ओळखणे, काय कमी आहे, काय चूक आहे यासारखे खेळ दिले जातात. त्यामुळे अक्षरे शिकताना अक्षरांमधील सूक्ष्म फरक मुले ओळखतात. अक्षरे शिकता शिकता ती केव्हा वाचायला लागतात हे कळतही नाही. लेखनासाठी बोटाच्या स्नायूंचा विकास व्हावा म्हणून मातीकाम, चित्र रंगवणे, ठसेकाम, चित्रे काढणे इ. खेळ दिले जातात. वाचनासाठी, लेखनासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली, तर लिहायला वाचायला फारसा वेळ लागत नाही. त्यासाठीची पूर्वतयारीच तर बालमंदिरात या प्रत्येक खेळातून, व्यवहारातून व उपक्रमातून केली जाते.

                     भारतीय संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्मसमभावाने मुलांच्या सहभागाने निरनिराळे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासणे फार महत्त्वाचे! त्यासाठी राष्ट्रीय सण, उत्सव, पुढाऱ्यांचे स्मृतिदिन, राष्ट्रध्वजाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेतले जातात.

            दिवाळीपूर्वी मुलांकडून भेटकार्ड तयार करून घेऊन पोस्टऑफिस हे ठिकाण प्रसारासाठी निवडले जाते. प्रत्येकाला आपले कार्ड पोस्टात टाकण्यास मिळते. त्याच वेळेस पोस्टाचाही परिचय दिला जातो. तिथे चाललेली कामे दाखवली जातात. तसेच पेट्रोल पंप, भाजी बाजार, धोबी, इस्त्रीवाला वगैरे ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना नेऊन ती कामे दाखवली जातात. वर्षअखेरीस साडेचार वर्षांवरील मुलांचे एक दिवसीय निवासी शिबीर घेतले जाते. आकाशदर्शन, शेकोटी, शेकोटीची प्रतिज्ञा, त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणणे, दुसऱ्या दिवशी सकाळी सहल अशी कार्यक्रमांची आखणी केली जाते.

            या शिबिरात संघवृत्ती, खिलाडूवृत्ती, स्वयंशिस्त, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आदि गुणांचा विकास होतो. शारीरिक स्वच्छता, परिसर स्वच्छता यासंबंधीचे प्रात्यक्षिक मुलांना पहायला मिळते. एका वर्षीच्या सहलीत मुलांना गवतावर पडलेले दव पहायला मिळाले. दवाचा आकार, ओलावा, त्याची चमचम असा चित्तथरारक अनुभव मुलांनी घेतला. मित्रांच्या सहवासात अधिक काळ राहायला मिळाल्यामुळे मुले खुश असतात.

              शिशुविहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक, शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून 'तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो,' असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे, असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.

            शिशुविहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु-बँकेची योजना आहे. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे, खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याज दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले १० वीपर्यंत यात पैसे साठवतात, त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.

          दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.

📝 *लेखन*


नदीची गोष्ट

बालकांचा हट्ट

बालविकास व शिस्त

बिचारी बालके

सवाई विक्रम


🎯  *चरित्र*


सौ. ललितकला शुक्ल यांनी ताराबाई मोडक यांचे चरित्र लिहिले आहे; ते ललितकला प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

      

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

भारतरत्न राजीव गांधी

 

  

          *भारतरत्न राजीव गांधी*

         (भारताचे सातवे पंतप्रधान)

       *जन्म : २० ऑगस्ट १९४४*

      (मुंबई, ब्रिटिश भारत)

       *मृत्यू : २१ मे १९९१*

   (श्रीपेरुमबुदूर,तमिळनाडू, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आई : इंदिरा नेहरू - गांधी

वडील : फिरोज जहांगीर गांधी

पत्नी : सोनिया गांधी

अपत्ये : राहुल गांधी, प्रियंका गांधी - वडेरा

व्यवसाय : वैमानिक, राजकारणी

 राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. १९८४ ते २ डिसे. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

 राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.


राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.


इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.


राजीव गांधी यांना मरणोत्तर *भारतरत्न* पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🌀 *सुरुवातीचे आयुष्य*

राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

💁‍♂️ *शिक्षण व वैवाहिक जीवन*


राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना १९६५च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियंका ही दोन अपत्ये झाली.

⚜️ *राजकारणात प्रवेश*

इ.स. १९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले.

⚜️ *पंतप्रधानपद*

३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

♨️ *आरोप*

इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. राजीव गांधी यांनी पुढीलप्रमाणे उद्गार काढल्याचे म्हटले जाते,"जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली.

🪙 *आर्थिक धोरणे*

राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.

💥 *हत्या*

इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

🪪 *टपालाचे तिकीट*

राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.


         

सोमवार, २८ जुलै, २०२५

ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

              *भारतरत्न*

*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*

              तथा  

*ए. पी. जे. अब्दुल कलाम*

(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)

*जन्म : १५ ऑक्टोबर १९३*

                *(रामेश्वर)*

*मृत्यू : २७ जुलै २०१५*

                *(शिलाँग)*

सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण

                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 

लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


🚀 *कार्य* 🛰

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 📚 *शिक्षण*

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


 ♦ *स्वभाव* 

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

🥇 *गौरव*

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

◼ *निधन*

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

       

रविवार, २७ जुलै, २०२५

कल्पना दत्ता


             *कल्पना दत्ता*

       (भारतीय क्रांतिकारक)


      *जन्म : 27 जुलै, 1913*

     (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)


     *मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995*

        (कलकत्ता, पश्चिम बंगाल)


इतर नाव : कल्पना जोशी

पति : पूरन चंद जोशी

नागरिकता : भारतीय

चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा

जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.


अन्य माहीती : सप्टेंबर  1979  मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.


कल्पना दत्ता  (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली. 


💁‍♀️ *सुरुवातीचे जीवन*


कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.


🔫 *सशस्त्र चळवळ*


चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.


🙍🏻‍♀️ *नंतरचे जीवन*


कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.


नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला.


💁‍♀️ *वैयक्तिक जीवन*


कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.


🎞️ *चित्रपट*


चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.

          

बुधवार, २३ जुलै, २०२५

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

                                                                                                                                                   


     क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद


      *जन्म : २३ जुलै, १९०६*

(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)

     *विरमरण : २७ फेब्रुवारी,*  

                     *१९३१*

      (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा

धर्म: हिंदू

वडील: पंडित सिताराम तिवारी

आई: जगरानी देवी


          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावातच राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.

            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.

       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.

         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.

         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”

        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.

       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”

       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

       

बुधवार, १८ जून, २०२५

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली



 अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे एक ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय वन्यजीव अभ्यासक, पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक होते. त्यांना 'अरण्यऋषी' या नावाने ओळखले जात असे.

त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला होता. त्यांनी वनखात्यात ३६ वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी देशभरात संशोधकवृत्तीने भटकंती केली, ५ लाख किमीहून अधिक प्रवास केला आणि १३ भाषांचे ज्ञान मिळवून आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत माहिती गोळा केली. या माहितीची त्यांनी शेकडो डायऱ्यांमध्ये नोंद केली, ज्या त्यांनी ३० वर्षे जपून ठेवल्या.

या नोंदींना शास्त्रीय आधार देऊन त्यांनी पक्षिकोश, प्राणिकोश आणि मत्स्यकोश यांसारख्या महत्त्वाच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच, अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींची वैशिष्ट्ये आणि वन्यजीवन विषद करणारी २५ पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून ते सतत कार्यरत होते.

मारुती चितमपल्ली यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता, जो त्यांना ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्याविषयी अजून काही माहिती खालीलप्रमाणे:

बालपण आणि शिक्षण

मारुती चितमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरमधील टी. एम. पोरे विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कोईम्बतूर येथील 'स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेज'मध्ये वनशास्त्रज्ञाचे प्रशिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची आवड होती आणि त्यांच्या पूर्वजांकडून झाडे लावणे, निसर्गावर प्रेम करणे या गोष्टी त्यांना मिळाल्या. त्यांचे 'लिंबामामा' हे त्यांना अरण्यविद्येतील गुरुस्थानी होते.

वनसेवा आणि संशोधन

चितमपल्ली यांनी महाराष्ट्र वन विभागात ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा केली. या काळात त्यांनी महाराष्ट्रातील विविध वनविभाग आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केले, ज्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून ते १९९० मध्ये निवृत्त झाले. आपल्या सेवाकाळात त्यांनी देशभरात ५ लाख किमीहून अधिक प्रवास केला आणि विविध आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधून वन्यजीव आणि निसर्गाबद्दल सखोल माहिती गोळा केली. या माहितीच्या त्यांनी शेकडो डायऱ्यांमध्ये नोंदी केल्या.

साहित्यिक योगदान

मारुती चितमपल्ली हे केवळ वनअधिकारी नव्हते, तर ते एक उत्तम लेखक आणि साहित्यकार होते. त्यांनी त्यांच्या डायऱ्यांमधील नोंदींना शास्त्रीय आधार देऊन अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले, ज्यात 'पक्षीकोश', 'प्राणिकोश' आणि 'मत्स्यकोश' यांचा समावेश आहे. त्यांनी वन्यजीव, पक्षी आणि वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवर आधारित २५ हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या काही प्रमुख पुस्तकांमध्ये:

 * निळावंती

 * रानवाटा

 * रातवा

 * केशराचा पाऊस

 * नवेगावबांधचे दिवस

 * चकवा चांदण : एक वनोपनिषद (आत्मचरित्र)

 * जंगलाचं देणं

 * शब्दांचं धन

 * मृगपक्षीशास्त्र

 * घरट्या पलिकडे

 * पाखरमाया

त्यांच्या लेखनाने मराठी साहित्यात वनविषयक साहित्याची समृद्ध परंपरा निर्माण केली. अनेक दुर्मीळ शब्द त्यांनी मराठी शब्दकोशात आणले.

पुरस्कार आणि सन्मान

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता, जो त्यांना ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, त्यांनी २००६ साली सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.

अंतिम क्षण

पद्मश्री पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर, १८ जून २०२५ रोजी (आज) वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे सोलापूर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने वन्यजीव संवर्धन, निसर्ग अभ्यास आणि मराठी साहित्य या क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दुर्दैवाने, वृद्धापकाळामुळे त्यांचे १८ जून २०२५ रोजी (आज) वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे कार्य वन्यजीव संवर्धन आणि मराठी साहित्यात अत्यंत मोलाचे मानले जाते.


मंगळवार, २७ मे, २०२५

मादाम भीकाजी रुस्तम कामा..

 मादाम भीकाजी रुस्तम कामा (Madame Bhikaji Rustom Cama) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि धाडसी नेत्या होत्या. त्यांना भारतीय क्रांतीची जननी म्हणून ओळखले जाते. परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

 * जन्म: २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबई (तत्कालीन बॉम्बे) येथील एका समृद्ध पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव भिकाजी सोराब पटेल होते.

 * शिक्षण: त्यांचे शिक्षण मुंबईतील 'एलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन'मध्ये झाले.

 * लग्न: १८८५ मध्ये त्यांनी प्रसिद्ध वकील रुस्तम कामा यांच्याशी विवाह केला. रुस्तम कामा हे ब्रिटिशधार्जिणे होते, तर भिकाजी कामा यांना स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाची तीव्र ओढ होती. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद होते.

परदेशातील स्वातंत्र्य चळवळ

मादाम कामा यांनी आपले बहुतांश क्रांतिकारक कार्य युरोपमध्ये केले:

 * युरोपमध्ये आगमन: १८९६ मध्ये मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी लोकांची सेवा केली, परंतु त्या स्वतः आजारी पडल्या. उपचारासाठी त्या १९०२ मध्ये युरोपला गेल्या.

 * क्रांतिकारकांशी संपर्क: लंडनमध्ये असताना त्यांची भेट भारतीय राष्ट्रवादी श्यामजी कृष्ण वर्मा, दादाभाई नौरोजी आणि नंतर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झाली. या भेटींमुळे त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशातून काम करण्याची प्रेरणा मिळाली. दादाभाई नौरोजींच्या खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले.

 * 'वंदे मातरम्' वृत्तपत्र: त्यांनी परदेशातून 'वंदे मातरम्' नावाचे वृत्तपत्र सुरू केले, ज्यातून त्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रखर लेखन करत होत्या.

 * पॅरिसमधील कार्य: १९०७ मध्ये त्या पॅरिसला गेल्या. पॅरिस हे भारतीय क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. त्यांनी तिथून 'तलवार' नावाचे क्रांतिकारी मासिकही काढले.

स्टुटगार्ट येथील ऐतिहासिक क्षण

 * भारतीय ध्वज फडकवणे (१९०७): १८ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती. या परिषदेत मादाम कामा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अत्यंत धाडसाने भारताचा पहिला तिरंगी ध्वज फडकवला.

   * या ध्वजात हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन पट्टे होते.

   * हिरवा रंग इस्लामसाठी, पिवळा बौद्ध आणि शीख धर्मांसाठी, तर लाल रंग हिंदू धर्मासाठी होता.

   * मध्यभागी 'वंदे मातरम्' लिहिलेले होते.

   * या ध्वजाला फडकवताना त्यांनी असे प्रतिपादन केले की, "हा भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे." या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीकडे लक्ष वेधले.

पुढील जीवन आणि निधन

 * पळून जाणे आणि संघर्ष: मादाम कामांच्या क्रांतिकारी कार्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांच्या मागावर होते. त्यांना अनेकदा युरोपमधील विविध देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला.

 * भारतात परत: ३५ वर्षांहून अधिक काळ परदेशात राहून, भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केल्यानंतर, १९३५ मध्ये त्या आजारी पडल्या आणि भारतात परतल्या.

 * निधन: १३ ऑगस्ट १९३६ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

मादाम कामा यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. परदेशात राहूनही त्यांनी भारतीयांना संघटित केले, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी दिशा दिली. त्यांच्या धाडसी कार्यामुळे त्यांना आजही आदराने स्मरण केले जाते.


अरुणा असफ अली


अरुणा असफ अली (Aruna Asaf Ali) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेत्या, क्रांतिकारी, शिक्षिका, आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांना 'भारत छोडो' आंदोलनाच्या नायिका म्हणून ओळखले जाते.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:

 * जन्म: १६ जुलै १९०९ रोजी तत्कालीन पंजाबमधील कालका (सध्या हरियाणाचा भाग) येथे एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होते.

 * शिक्षण: त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरमधील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रोटेस्टंट विद्यालयात झाले. त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे कामही केले होते.

 * लग्न: १९२८ मध्ये त्यांनी प्रसिद्ध वकील आणि काँग्रेस नेते असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. त्यावेळी त्या अवघ्या १९ वर्षांच्या होत्या, तर असफ अली त्यांच्यापेक्षा २३ वर्षांनी मोठे होते. त्यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. असफ अली हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने अरुणा असफ अली यांचा भारतीय स्वातंत्र्यचळवळीशी संबंध आला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान:

अरुणा असफ अली यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी होते:

 * मिठाचा सत्याग्रह आणि कायदेभंग चळवळ: १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच १९३० आणि १९३२ च्या कायदेभंग चळवळीतही त्या सहभागी झाल्या. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. १९३२ मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले. तुरुंगात असतानाही त्यांनी कैद्यांच्या सुधारणांसाठी उपोषण केले.

 * भारत छोडो आंदोलन (१९४२): हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे.

   * ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान) अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन होते. या अधिवेशनात 'भारत छोडो' चा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.

   * याच रात्री ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना अटक केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली.

   * ९ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी, गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही, अरुणा असफ अली यांनी पोलिसांच्या वेढ्याला भेदून धाडसाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज (तिरंगा) फडकवला. 'करो वा मरो' या महात्मा गांधींच्या संदेशाला प्रतिसाद देत, त्यांनी हे धाडसी कृत्य केले. या घटनेमुळे त्यांना 'ऑगस्ट क्रांती दिनाची वीरांगना' म्हणून ओळखले जाऊ लागले.

   * या घटनेनंतर, ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्यावर ५००० रुपयांचे बक्षीस ठेवले. मात्र, पुढील चार वर्षे (१९४२-१९४६) त्या भूमिगत राहून चळवळीला सक्रियपणे हातभार लावत राहिल्या. त्यांनी भूमिगत राहून सभा आयोजित केल्या आणि तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.

स्वातंत्र्योत्तर जीवन आणि सन्मान:

स्वातंत्र्यानंतरही अरुणा असफ अली राजकारणात आणि समाजसेवेत सक्रिय राहिल्या:

 * १९४७ मध्ये त्या दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

 * १९५८ मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या.

 * त्यांनी 'लिंक' नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि 'पेट्रियट' नावाच्या वृत्तपत्राचे प्रकाशनही केले, ज्यातून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपले विचार मांडले.

 * त्या आयुष्यभर खादीचे कपडे वापरत असत आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते.

मिळालेले पुरस्कार आणि सन्मान:

 * १९५५: सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक

 * १९६४: आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार

 * १९९१: आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार

 * १९९२: पद्मविभूषण (भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान)

 * १९९७: भारतरत्न (मरणोत्तर, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान)

२९ जुलै १९९६ रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. अरुणा असफ अली या त्यांच्या धाडसासाठी, निडरतेसाठी आणि स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानासाठी नेहमी स्मरणात राहतील. त्यांना 'ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन इंडिपेंडन्स' असेही म्हटले जाते.


जगदीश चंद्र बोस

 

आचार्य जगदीश चंद्र बोस हे एक महान भारतीय वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक होते. त्यांना "आधुनिक भारतीय विज्ञानाचे जनक" मानले जाते.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:

 * जन्म: ३० नोव्हेंबर १८५८ रोजी मयमनसिंग, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (सध्या बांगलादेशमध्ये) येथे त्यांचा जन्म झाला.

 * शिक्षण: त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले, जिथे त्यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये (St. Xavier's College) शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात (Natural Sciences Tripos) पदवी संपादन केली. त्यांनी लंडन विद्यापीठातूनही विज्ञान पदवी (BSc) प्राप्त केली.

प्रमुख संशोधन आणि योगदान:

जगदीश चंद्र बोस यांनी अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे त्यांना "पॉलिमॅथ" (अनेक विषयांत पारंगत) म्हणून ओळखले जाते.

 * रेडिओ आणि सूक्ष्म तरंग (Microwaves):

   * ते रेडिओ आणि सूक्ष्म तरंग प्रकाशिकीचे (Microwave Optics) आद्य प्रवर्तक मानले जातात.

   * १८९५ मध्ये, त्यांनी रेडिओ तरंगांवर यशस्वी प्रयोग केले आणि त्यांची निर्मिती व शोध लावण्यासाठी आवश्यक उपकरणे तयार केली. त्यांनी ५ मिमी पर्यंत लहान सूक्ष्म तरंग तयार केल्या, ज्या आज रडार, सेल्युलर फोन आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरल्या जातात.

   * IEEE (Institute of Electrical and Electronics Engineers) ने त्यांना "रेडिओ सायन्सचे जनक" म्हणून मान्यता दिली आहे.

   * ते अमेरिकन पेटंट मिळवणारे पहिले आशियाई वैज्ञानिक होते (१९०४ मध्ये, गॅलेना (galena) क्रिस्टल डिटेक्टरसाठी).

 * वनस्पतिशास्त्र आणि क्रेस्कोग्राफ (Crescograph):

   * बोस यांनी वनस्पतींनाही सजीव प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केले. त्यांना "वनस्पतिशास्त्र आणि बायोफिजिक्सचे जनक" म्हणूनही ओळखले जाते.

   * त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचे एक अत्यंत संवेदनशील उपकरण शोधले. या उपकरणाद्वारे त्यांनी वनस्पतींच्या वाढीचे आणि बाह्य उत्तेजनांना (उदा. प्रकाश, तापमान, विद्युत प्रवाह, स्पर्श, रसायने) वनस्पतींच्या प्रतिसादाचे सूक्ष्म निरीक्षण केले.

   * या शोधातून त्यांनी वनस्पतींना दुःख, वेदना आणि भावना असतात हे दाखवून दिले, जे त्यावेळी एक क्रांतिकारी विचार होता.

 * इतर योगदान:

   * त्यांनी अर्धवाहक (Semiconductor) जंक्शनचा वापर रेडिओ तरंग शोधण्यासाठी केला, जे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये महत्त्वाचे ठरले.

   * ते बंगाली विज्ञानकथा साहित्याचे जनक मानले जातात.

   * १९१७ मध्ये, त्यांनी बोस इन्स्टिट्यूट (Bose Institute), कोलकाता येथे स्थापन केली, जे भारतातील आंतरविद्याशाखीय संशोधनाचे (Interdisciplinary Research) पहिले आधुनिक केंद्र होते.

सन्मान आणि निधन:

 * त्यांना १९१७ मध्ये 'नाईट' (Knight) या पदवीने सन्मानित करण्यात आले.

 * त्यांचे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.

जगदीश चंद्र बोस यांचे कार्य हे भारतीय विज्ञानासाठी एक मैलाचा दगड आहे. त्यांनी विज्ञानाच्या अनेक शाखांना जोडले आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाया रचला.


सोमवार, २६ मे, २०२५

राजा राम मोहन रॉय

 राजा राम मोहन रॉय हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि धार्मिक विचारवंत होते. त्यांना "आधुनिक भारताचे जनक" किंवा "भारतीय प्रबोधनाचे जनक" म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला अंधश्रद्धा, सामाजिक दुष्प्रथा आणि रूढीवादी विचारांमधून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

 * जन्म: २२ मे १७७२ रोजी बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर गावात एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

 * शिक्षण: त्यांचे शिक्षण फार व्यापक होते. त्यांनी लहान वयातच बंगाली, पर्शियन, अरबी, संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू यांसारख्या अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. यामुळे त्यांना विविध धर्मग्रंथांचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता आला.

प्रमुख सामाजिक आणि धार्मिक सुधारणा

राजा राम मोहन रॉय यांनी समाजातील अनेक वाईट चालीरीतींविरुद्ध आवाज उचलला आणि त्यांच्या सुधारणेसाठी अथक प्रयत्न केले:

 * सतीप्रथा निर्मूलन: हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सतीप्रथेला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले, सार्वजनिक सभा घेतल्या आणि ब्रिटिश सरकारवर दबाव आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८२९ मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीप्रथेला कायद्याने गुन्हा ठरवून ती बंद केली.

 * विधवा विवाह समर्थन: त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि त्यासंदर्भात समाजात जागृती केली.

 * बालविवाहास विरोध: त्यांनी बालविवाहाच्या विरोधात आवाज उचलला आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला.

 * जातिभेद आणि अस्पृश्यता: त्यांनी जातिभेद आणि अस्पृश्यता या सामाजिक दुष्प्रथांवर टीका केली आणि समानतेचे समर्थन केले.

 * स्त्रियांचे हक्क: स्त्रियांना संपत्तीचा हक्क मिळावा, त्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी जोरदार वकिली केली.

 * एकेश्वरवादाचा प्रसार: त्यांनी मूर्तिपूजा आणि कर्मकांडांना विरोध केला. सर्व धर्मांमध्ये एकच ईश्वर आहे, या एकेश्वरवादाचे त्यांनी समर्थन केले. त्यांनी उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचा प्रचार केला.

 * ब्रह्म समाज स्थापना (१८२८): त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १८२८ मध्ये 'ब्रह्म समाज' (आधी 'ब्रह्मसभा') ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश एकेश्वरवादावर आधारित उपासना, सामाजिक सुधारणा आणि नैतिक मूल्यांचा प्रचार करणे हा होता.

पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात योगदान

 * पत्रकारिता: राजा राम मोहन रॉय यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिके सुरू केली:

   * संवाद कौमुदी (बंगाली साप्ताहिक): १८२१ मध्ये सुरू केले, जे सामाजिक सुधारणांचा प्रचार करत होते.

   * मिरात-उल-अखबार (पर्शियन साप्ताहिक): १८२२ मध्ये सुरू केले, हे भारतातील पहिले पर्शियन वृत्तपत्र होते.

   * ब्रह्मनिकल मॅगझीन (इंग्रजी): यात त्यांनी आपल्या धार्मिक आणि तत्त्वज्ञानासंबंधीचे विचार मांडले.

 * शिक्षण: त्यांनी पाश्चात्त्य (इंग्रजी) शिक्षणाचे जोरदार समर्थन केले. आधुनिक विज्ञान, गणित आणि इतर विषयांचे शिक्षण भारतीयांना मिळावे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी डेव्हिड हेअर यांच्यासोबत १८१७ मध्ये हिंदू कॉलेज (सध्याचे प्रेसिडन्सी कॉलेज) स्थापन करण्यास मदत केली.

आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन

राजा राम मोहन रॉय यांचा दृष्टिकोन केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता, तर ते जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. १८३० मध्ये ते मोगल बादशहा दुसरे अकबर शाह यांच्या वतीने इंग्लंडला गेले, जिथे त्यांना 'राजा' ही पदवी प्रदान करण्यात आली होती. तिथेच २७ सप्टेंबर १८३३ रोजी ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले.

राजा राम मोहन रॉय यांचे कार्य हे भारताच्या सामाजिक आणि बौद्धिक जागृतीचे प्रतीक आहे. त्यांनी आधुनिक विचारांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे पेरली, ज्यामुळे नंतरच्या काळात अनेक सुधारणावादी चळवळींना प्रेरणा मिळाली.


श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील

 श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या १२व्या राष्ट्रपती होत्या. भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या, हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण होता.

व्यक्तिगत जीवन आणि शिक्षण:

 * जन्म: १९ डिसेंबर १९३४ रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये नाडगाव (तालुका-मुक्ताईनगर, तेव्हाचे-एदलाबाद) येथे त्यांचा जन्म झाला.

 * शिक्षण: त्यांचे शालेय शिक्षण जळगाव येथील आर.आर. विद्यालयात झाले. जळगाव शहरातील नामांकित मु.जे. महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी विधी स्नातक (LLB) पदवी संपादन केली.

 * खेळ: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या टेबल टेनिस या क्रीडा प्रकारातही प्रावीण्य मिळवले होते.

 * पती: त्यांचे पती डॉ. देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे २०२३ मध्ये निधन झाले.

राजकीय कारकीर्द:

प्रतिभाताई पाटील यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आणि यशस्वी राहिली आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या आपल्या अखंड राजकीय जीवनात कुठल्याही निवडणुकीत कधीही पराभूत झाल्या नाहीत.

 * महाराष्ट्र विधानसभा सदस्य: वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी, १९६२ मध्ये त्या पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आल्या आणि जळगाव मतदारसंघाच्या आमदार झाल्या. त्यानंतर १९८५ पर्यंत त्या सलग ४ वेळा एदलाबाद (मुक्ताईनगर) मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून आल्या.

 * महाराष्ट्रात मंत्रीपदे: महाराष्ट्रात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची मंत्रीपदे भूषवली, ज्यात सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कार्य, समाजकल्याण, पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादींचा समावेश आहे.

 * महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद: त्यांनी १९८८-१९९० दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही भूषविले.

 * राज्यसभा सदस्य आणि उपसभापती: १९८५ ते १९९० या काळात त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर १८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हेंबर १९८८ या काळात त्यांनी राज्यसभेच्या उपसभापती पदाची धुरा सांभाळली.

 * लोकसभा सदस्य: १९९१ ते १९९६ या काळात त्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

 * राजस्थानच्या राज्यपाल: राष्ट्रपती होण्यापूर्वी, ८ नोव्हेंबर २००४ ते २३ जून २००७ या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.

 * भारताच्या राष्ट्रपती: २५ जुलै २००७ रोजी त्यांनी भारताच्या १२व्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आणि २५ जुलै २०१२ पर्यंत या पदावर कार्यरत राहिल्या. भारताच्या या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

सामाजिक कार्य:

 * श्रीमती पाटील यांनी महिला विकास, बालकल्याण आणि समाजातील वंचित घटकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

 * महिला विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महिला विकास महामंडळाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

 * महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात त्यांनी गरीब आणि गरजू महिलांसाठी संगीत, संगणक आणि शिवणकला वर्ग सुरू केले.

 * राष्ट्रपती असताना त्यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी 'रोशनी' प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

प्रतिभाताई पाटील या त्यांच्या शालीन स्वभाव आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात. सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचा प्रवास हा विशेषतः महिलांसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.


सयाजी शिंदे

 सयाजी शिंदे  हे एक भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू, तमिळ, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांसाठी विशेष ओळखले जाते.

वैयक्तिक जीवन आणि कारकीर्द

 * जन्म: सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथे झाला.

 * शिक्षण: त्यांनी मराठी भाषेत कला शाखेची पदवी घेतली आहे.

 * कारकीर्दीची सुरुवात: १९७८ मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागात रात्रीचा चौकीदार म्हणून काम करत असताना आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. याच काळात त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली.

 * अभिनयाची सुरुवात: त्यांनी १९७८ मध्ये मराठी एकांकिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांच्या "झुलवा" या मराठी नाटकात त्यांनी केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

 * चित्रपटांमध्ये प्रवेश: त्यांचा पहिला मराठी चित्रपट १९९५ मधील "अबोली" होता. राम गोपाल वर्मा यांच्या "शूल" (१९९९) या हिंदी चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, ज्यात त्यांनी बच्चू यादव हे पात्र साकारले होते.

 * बहुभाषिक अभिनेते: सयाजी शिंदे यांनी जवळपास ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, ४ मराठी आणि काही इंग्रजी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रमुख चित्रपट (काही निवडक)

 * हिंदी:

   * शूल (१९९९)

   * कुरुक्षेत्र (२०००)

   * जोडी नं॰ १ (२००१)

   * दामन (२००१)

   * आमदनी अठन्नी खर्चा रुपइया (२००१)

   * रोड (२००२)

   * कर्ज़ (२००२)

   * परवाना (२००३)

   * बिग ब्रदर (२००७)

   * सरकार राज (२००८)

   * संजू (२०१८ - दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत)

   * अंतिम: द फाइनल ट्रुथ (२०२१)

   * किलर सूप (२०२४ - टीव्ही मालिका)

   * औरों में कहां दम था (२०२४)

 * तेलुगू आणि तमिळ:

   * भारती (२००० - तमिळ; या चित्रपटातील तमिळ कवी सुब्रमण्य भारती यांच्या भूमिकेसाठी त्यांना तमिळनाडू राज्य पुरस्कार मिळाला)

   * अझागी (२००२)

   * धूल (२००३)

   * पोकिरी (२००६)

   * सुपर (२००५)

   * किक (२००९)

   * 1: नेनोक्कडीने (२०१४)

   * डबल आईस्मार्ट (२०२४)

   * घर बंदूक बिरयानी (२०२३)

इतर कार्ये

 * ते एक निर्माता देखील आहेत आणि त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

 * ते महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेसाठी देखील सक्रियपणे काम करतात.

 * अलिकडेच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करून राजकारणातही पाऊल ठेवले आहे.


शनिवार, २४ मे, २०२५

आचार्य विनोबा भावे:

 आचार्य विनोबा भावे:  भूदान चळवळीचे प्रणेते

आचार्य विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५, गागोदे, रायगड जिल्हा, महाराष्ट्र; निधन: १५ नोव्हेंबर १९८२, पवनार, वर्धा) हे महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार म्हणून ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे होते. गांधीजींनी त्यांना 'विनोबा' असे संबोधले आणि पुढे ते याच नावाने प्रसिद्ध झाले. ते एक महान विचारवंत, समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि स्वातंत्र्यसेनानी होते.

प्रारंभिक जीवन आणि गांधीजींशी संबंध:

विनोबा भावे यांचा जन्म एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बडोदा येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म आणि समाजसेवेत रुची होती. १९१६ मध्ये ते महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि गांधीजींच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले. गांधीजींनी त्यांना 'आपला आध्यात्मिक वारसदार' मानले. १९४० मध्ये गांधीजींनी 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, तेव्हा पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी विनोबा भावेंची निवड केली.

प्रमुख कार्य आणि चळवळी:

विनोबा भावे यांचे जीवन समाजसेवा आणि मानवतेसाठी समर्पित होते. त्यांची सर्वात महत्त्वाची आणि जगभरात ओळखली जाणारी चळवळ म्हणजे भूदान चळवळ.

 * भूदान चळवळ (१९५१): स्वातंत्र्योत्तर काळात भारतात जमीन मालकीची प्रचंड विषमता होती. बहुसंख्य लोक भूमिहीन होते, तर काही लोकांकडे हजारो एकर जमीन होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये तेलंगणातील पोचमपल्ली गावातून भूदान चळवळीला सुरुवात केली. ही एक अहिंसक आणि ऐच्छिक चळवळ होती, जिथे ते श्रीमंत जमीनदारांना आपली अतिरिक्त जमीन भूमिहीनांना दान देण्याचे आवाहन करत होते.

   * या चळवळीत विनोबांनी भारतभर पदयात्रा केली आणि लोकांना हृदयपरिवर्तन करून जमीन दान करण्याचे आवाहन केले.

   * त्यांनी 'जय जगत' (जगाचा विजय असो) हा नारा दिला, जो त्यांच्या वैश्विक आणि समावेशक दृष्टिकोनाचे प्रतीक होता.

   * भूदान चळवळीचे पुढचे पाऊल म्हणजे 'ग्रामदान'. यात संपूर्ण गावच समाजाला दान केले जात असे आणि जमिनीची मालकी वैयक्तिक न राहता गावाच्या सामूहिक मालकीची होत असे.

   * त्यांनी लाखो एकर जमीन दान म्हणून मिळवली आणि ती भूमिहीन गरीब शेतकऱ्यांमध्ये वाटली. ही एक शांततापूर्ण सामाजिक क्रांती होती.

 * सर्वोदय संकल्पना: गांधीजींच्या 'सर्वोदय' (सर्वांचे कल्याण) या संकल्पनेचे विनोबा भावे यांनी अत्यंत प्रभावीपणे पुढे नेले. त्यांनी 'सर्वोदय' म्हणजे केवळ भौतिक सुख नव्हे, तर अध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसह सर्वांचा विकास असे स्पष्ट केले. जातीय भेदभाव, शोषणमुक्त समाज आणि स्वयंपूर्ण गावे हे त्यांच्या सर्वोदयाचे महत्त्वाचे पैलू होते.

 * शिक्षणाचे कार्य: विनोबा भावे यांनी शिक्षणावरही भर दिला. त्यांनी 'ब्रह्मविद्या मंदिर' आणि 'समन्वय आश्रम' यांसारख्या संस्था स्थापन केल्या, जिथे शिक्षण आणि अध्यात्म यांचा समन्वय साधला जात असे. त्यांना २७ हून अधिक भाषा अवगत होत्या.

विचार आणि तत्त्वज्ञान:

 * अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींप्रमाणेच विनोबा भावे हे अहिंसेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विरोध केला आणि समाज परिवर्तनासाठी अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यावर भर दिला.

 * लोकनीती आणि शासनमुक्त समाज: ते राजकारणाला आणि सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करत होते. त्यांना असा समाज हवा होता, जिथे लोक स्वयंप्रेरणेने आणि नैतिक तत्त्वांवर आधारित व्यवहार करतील आणि शासनाची भूमिका कमी होईल.

 * शरीरश्रम निष्ठा: प्रत्येक व्यक्तीने शरीरश्रम करावेत असे ते मानत होते. ते स्वतः सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांसारख्या कामांमध्ये नियमितपणे सहभागी होत असत.

 * कांचन मुक्ती (पैशापासून मुक्ती): समाजातील विषमतेचे एक कारण पैसा आहे असे ते मानत होते आणि म्हणूनच त्यांनी आश्रमांमध्ये 'कांचन मुक्ती'चा प्रयोग सुरू केला, जिथे वस्तूंचा विनिमय स्वावलंबनाने आणि श्रमाने केला जात असे.

पुरस्कार आणि सन्मान:

१९५८ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते. १९८३ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विनोबा भावे हे केवळ एक विचारवंत नव्हते, तर त्यांनी आपले विचार प्रत्यक्ष कृतीत आणले. त्यांच्या भूदान चळवळीने स्वातंत्र्योत्तर भारतात शांततापूर्ण सामाजिक बदलाचे एक अद्वितीय उदाहरण सादर केले. त्यांचे जीवन आणि कार्य आजही जगाला अहिंसा, समानता आणि मानवतेचा संदेश देत आहे.


महात्मा गांधी

  महात्मा गांधी हे देखील भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रमुख नेते आणि अहिंसक असहकार चळवळीचे प्रणेते होते.

जीवन आणि प्रारंभिक काळ:

 * बालपण आणि शिक्षण: गांधीजींचे वडील करमचंद गांधी हे राजकोट संस्थानाचे दिवाण होते, तर आई पुतळीबाई एक धार्मिक वृत्तीची स्त्री होती. त्यांचे प्रारंभिक शिक्षण राजकोट येथे झाले. १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले आणि १८९१ मध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परतले.

 * दक्षिण आफ्रिकेतील अनुभव: भारतात परतल्यानंतर त्यांना कायद्याच्या व्यवसायात म्हणावे तसे यश मिळाले नाही. १८९३ मध्ये ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. तिथे त्यांना वर्णद्वेष आणि भारतीयांवर होणाऱ्या भेदभावाचा अनुभव आला. या अनुभवाने त्यांचे जीवन बदलले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली, जी सुमारे २१ वर्षे चालली. याच काळात त्यांनी अहिंसक प्रतिकाराचे तत्त्वज्ञान विकसित केले.

भारतातील स्वातंत्र्य संग्राम आणि नेतृत्व:

१९१५ मध्ये गांधीजी भारतात परतले. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास करून येथील परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला आणि लवकरच ते त्याचे प्रमुख नेते बनले.

त्यांच्या नेतृत्वाखालील काही महत्त्वाच्या चळवळी:

 * चंपारण सत्याग्रह (१९१७): बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांवर इंग्रज सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा पहिला मोठा सत्याग्रह होता.

 * खेडा सत्याग्रह (१९१८): गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा सत्याग्रह होता.

 * असहकार आंदोलन (१९२०-२२): जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलेट कायद्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

 * सविनय कायदेभंग आंदोलन (दांडी यात्रा, १९३०): मिठावरील कराविरुद्ध आणि ब्रिटिश कायद्यांचे उल्लंघन करण्यासाठी ही प्रसिद्ध दांडी यात्रा काढण्यात आली होती.

 * भारत छोडो आंदोलन (१९४२): हे ब्रिटिश राजवटीविरुद्धचे अंतिम आणि निर्णायक आंदोलन होते, ज्याने ब्रिटिशांना भारत सोडायला भाग पाडले.

गांधीजींचे तत्त्वज्ञान आणि विचार:

गांधीजींच्या विचारांचा मूळ आधार 'सत्य' आणि 'अहिंसा' हे होते. त्यांनी 'सत्याग्रह' हे शस्त्र म्हणून वापरले, ज्याचा अर्थ सत्यासाठी आग्रह धरणे आणि अन्यायाचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करणे.

त्यांच्या इतर महत्त्वाच्या विचार प्रणाली:

 * सर्वधर्म समभाव: सर्व धर्म समान आहेत आणि प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा, असे ते मानत होते.

 * ग्राम स्वराज्य: प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असावे आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत, असे त्यांना अपेक्षित होते.

 * अस्पृश्यता निवारण: त्यांनी अस्पृश्यतेला तीव्र विरोध केला आणि हरिजनांच्या (दलित) उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले.

 * साधे जीवन: ते स्वतः अत्यंत साधे जीवन जगत होते आणि इतरांनाही साधेपणाचा संदेश देत होते.

 * स्वदेशी: भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला.

निधन आणि वारसा:

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगभरात शोककळा पसरली.

आजही महात्मा गांधी हे 'राष्ट्रपिता' म्हणून ओळखले जातात. त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि सत्याग्रहाचा आदर्श जगभरातील अनेक स्वातंत्र्य चळवळींना आणि शांतता आंदोलनांना प्रेरणा देत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून घोषित केला आहे, हे त्यांच्या जागतिक प्रभावाचे एक प्रतीक आहे.


रवींद्रनाथ टागोर..

 रवींद्रनाथ टागोर: एक महान भारतीय व्यक्तिमत्व

रवींद्रनाथ टागोर (जन्म: ७ मे १८६१, कलकत्ता; निधन: ७ ऑगस्ट १९४१, कलकत्ता) हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते, जे कवी, नाटककार, संगीतकार, चित्रकार आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांना 'गुरुदेव' या नावानेही संबोधले जाते. भारतीय साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

जीवन आणि शिक्षण:

टागोर यांचा जन्म कोलकाता येथील एका प्रतिष्ठित पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर हे एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि धार्मिक सुधारक होते. पारंपरिक शाळेत त्यांचे मन रमले नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण घरीच झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि सोळाव्या वर्षी 'भानुसिंह' या टोपण नावाने कविता आणि कथा लिहायला सुरुवात केली.

साहित्यिक योगदान:

रवींद्रनाथ टागोर यांनी २००० हून अधिक रचना केल्या आहेत. त्यांच्या साहित्यात कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध आणि प्रवासवर्णनांचा समावेश आहे. त्यांची काही प्रमुख साहित्यकृती खालीलप्रमाणे आहेत:

 * गीतांजली: हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे, ज्यासाठी त्यांना १९१३ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले गैर-युरोपियन आणि आशियातील पहिले व्यक्ती होते.

 * गोरा: ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे.

 * काबुलीवाला: ही त्यांची एक प्रसिद्ध लघुकथा आहे.

 * चिरकुमारसभा: हे त्यांचे एक प्रहसन (विनोदी नाटक) आहे.

 * जन गण मन: हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी रचले आहे.

 * आमार शोनार बांग्ला: हे बांगलादेशचे राष्ट्रगीतही त्यांनी रचले आहे. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले ते पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरित आहे.

 * चित्त जेथा भयशून्य (Where the Mind is Without Fear): ही त्यांची एक अत्यंत प्रेरणादायी कविता आहे, जी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणागीत म्हणून वापरली गेली.

 * एकला चलो रे: हे त्यांचे एक प्रसिद्ध गीत आहे.

 * चंडालीका, विसर्जन, चित्रांगदा, राजा, मायर खेला: ही त्यांची इतर नाटके आहेत.

विचार आणि तत्त्वज्ञान:

टागोर यांचे विचार मानवता, राष्ट्रवाद, शिक्षण आणि कलेबद्दल होते. ते देशांना देव म्हणून पूजण्याला विरोध करत होते आणि देशभक्ती व राष्ट्रवादात स्पष्ट फरक करत होते. त्यांचे शिक्षणविषयक विचारही क्रांतिकारी होते, ते शिक्षणाने मुलांना बंधनांपासून मुक्त करून अंतिम सत्याचा आविष्कार घडवावा असे मानत होते. त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली, जिथे निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात असे.

इतर योगदान:

टागोर हे केवळ साहित्यिकच नव्हते तर एक कुशल चित्रकार आणि संगीतकारही होते. त्यांनी अनेक गाणी रचली, ज्यांना 'रवींद्र संगीत' असे म्हटले जाते. त्यांचे चित्रकला क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे आहे.

रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य बंगाली साहित्य आणि संगीतावर इतके प्रभावी ठरले आहे की बंगाली साहित्याची 'रवींद्रपूर्व' आणि 'रवींद्रोत्तर' अशी विभागणी केली जाते. त्यांनी भारतीय संस्कृती आणि साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळवून दिली.


शुक्रवार, २३ मे, २०२५

पांडुरंग सदाशिव साने..

 पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण प्रेमाने साने गुरुजी (Sane Guruji) म्हणून ओळखतो, हे महाराष्ट्रातील एक महान शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, स्वातंत्र्यसैनिक, आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण, समाजसेवा, आणि मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी समर्पित केले.

जन्म आणि सुरुवातीचे जीवन:

 * जन्म: २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

 * बालपण आणि शिक्षण: त्यांचे बालपण अत्यंत संस्कारक्षम वातावरणात गेले. त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, ज्यांनी त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण दिली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी दापोली, पुणे आणि अमळनेर येथे घेतले. बी.ए.ची पदवी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून मिळवली.

 * शिक्षकी पेशा: शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. येथेच त्यांना 'गुरुजी' ही उपाधी मिळाली. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

प्रमुख योगदान आणि कार्य:

 * उत्कृष्ट लेखक आणि कवी:

   * साने गुरुजींनी मराठी साहित्यात विपुल लेखन केले. त्यांनी कथा, कविता, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, निबंध आणि वैचारिक लेखन असे विविध प्रकार हाताळले.

   * 'श्यामची आई' हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे, जे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले.

   * त्यांचे 'धडपडणारी मुले', 'सुंदर पत्रे', 'श्याम', 'भारतीय संस्कृती', 'अमोल गोष्टी', 'गोड गोष्टी' यांसारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

   * त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, त्याग, करुणा आणि मानवतेचा संदेश असे. 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे त्यांचे गीत खूप प्रसिद्ध आहे.

 * स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रभक्ती:

   * साने गुरुजी हे महात्मा गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित होते. त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

   * स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असतानाही त्यांनी आपले लेखन आणि वैचारिक कार्य चालू ठेवले.

 * समाजसुधारक आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते:

   * आंतरजातीय विवाह आणि अस्पृश्यतानिवारण: साने गुरुजींनी जातीय भेदभावाला तीव्र विरोध केला. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अथक प्रयत्न केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४७ मध्ये आमरण उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले आणि मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले.

   * सर्वधर्म समभाव: त्यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण दिली. त्यांच्या विचारांवर संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या भक्ती परंपरेचा प्रभाव होता.

   * गरिबी आणि दारिद्र्य निर्मूलन: गरीब आणि उपेक्षित लोकांबद्दल त्यांना खूप सहानुभूती होती. त्यांनी त्यांचे जीवन गरिबांच्या उद्धारासाठी समर्पित केले.

 * बालभारती आणि 'साधना' साप्ताहिक:

   * लहान मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची आणि मूल्यांची वाढ व्हावी यासाठी त्यांनी 'बालभारती' नावाचे साप्ताहिक सुरू केले.

   * १९४८ मध्ये त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केले, जे आजही विचारप्रवर्तक लेखन आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करते.

विचारधारा:

साने गुरुजींच्या विचारांमध्ये प्रेम, विश्वबंधुत्व, मानवतावाद, समता आणि राष्ट्रभक्ती हे प्रमुख होते. त्यांनी आदर्श समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

निधन:

११ जून १९५० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य आणि विचार आजही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक-शैक्षणिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांना त्यांच्या मानवतेच्या आणि निःस्वार्थ सेवेच्या कार्यामुळे कायम स्मरणात ठेवले जाते.


महर्षी धोंडो केशव कर्वे..

 महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve) हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी महिला शिक्षण, विधवा विवाह, आणि सामाजिक समता या क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान दिले. त्यांना 'महर्षी' ही उपाधी जनतेनेच त्यांच्या महान कार्यासाठी दिली होती.

जन्म आणि सुरुवातीचे जीवन:

 * जन्म: १८ एप्रिल १८५८ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेरावली या गावी त्यांचा जन्म झाला.

 * शिक्षण: त्यांचे प्राथमिक शिक्षण मिरजोळी येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून गणितात पदवी संपादन केली (१८८४).

 * सुरुवातीची कारकीर्द: पदवी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले.

प्रमुख योगदान आणि कार्य:

 * विधवा विवाहाचे पुरस्कर्ते आणि कृती:

   * १८९१ मध्ये त्यांनी बालविधवा असलेल्या गोदूबाई (आनंदीबाई) यांच्याशी पुनर्विवाह केला. हा निर्णय त्या काळात अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारक होता, कारण समाजात विधवा विवाहाला तीव्र विरोध होता.

   * या विवाहानंतर त्यांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले, पण त्यांनी आपला निश्चय सोडला नाही.

   * हा विवाह म्हणजे त्यांच्या समाजसुधारक कार्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी होती.

 * विधवा विवाह उत्तेजन मंडळ (१८९३) आणि अनाथ बालिकाश्रम (१८९६):

   * विधवा विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी १८९३ मध्ये 'विधवा विवाह उत्तेजन मंडळ' स्थापन केले.

   * त्यानंतर, विधवा आणि परित्यक्ता स्त्रिया तसेच अनाथ मुलींना आश्रय आणि शिक्षण देण्यासाठी त्यांनी १८९६ मध्ये पुण्याजवळील हिंगणे येथे 'अनाथ बालिकाश्रम' स्थापन केले. हे त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य होते, कारण यामुळे अनेक निराधार स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा मार्ग मिळाला.

 * महिला शिक्षणाचे प्रणेते:

   * शिक्षणानेच स्त्रियांचे सक्षमीकरण होऊ शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

   * महिला विद्यापीठाची स्थापना (१९१६): त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि ऐतिहासिक कार्य म्हणजे १९१६ मध्ये त्यांनी 'भारतीय महिला विद्यापीठाची' स्थापना केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ होते, ज्याला आता श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (S.N.D.T.) महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.

   * या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु जपानमधील महिला विद्यापीठाने त्यांना प्रेरणा दिली. हे विद्यापीठ त्यांनी आपल्या स्वकष्टाने, लोकवर्गणीतून आणि देणग्यांतून उभे केले.

   * आजही हे विद्यापीठ महिला शिक्षणात अग्रेसर आहे आणि लाखो महिलांना उच्च शिक्षण देत आहे.

 * ग्रामशिक्षण आणि समता:

   * शिक्षणाचा प्रसार केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता, तो खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी १९२० मध्ये 'महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' स्थापन केले.

   * १९२७ मध्ये त्यांनी 'समता संघ' स्थापन केला, ज्याचा उद्देश जातीय समानता आणि सामाजिक एकोपा वाढवणे हा होता.

 * आत्मचरित्र:

   * त्यांनी आपले आत्मचरित्र 'आत्मवृत्त' या नावाने लिहिले आहे, जे त्यांच्या जीवनकार्याचा आरसा आहे.

पुरस्कार आणि सन्मान:

 * त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९५५ मध्ये 'पद्मविभूषण' या किताबाने सन्मानित केले.

 * त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त, १९५८ मध्ये त्यांना 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतरत्न मिळालेले ते सर्वात जास्त वयाचे व्यक्ती होते.

 * १९५१ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डी. लिट.' (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान केली.

निधन:

९ नोव्हेंबर १९६२ रोजी वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक दूरदृष्टीचे समाजसुधारक होते, ज्यांनी समाजाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे महिला शिक्षण आणि विधवा विवाह या क्षेत्रातील कार्य आजही एक प्रेरणास्रोत आहे.


लोकप्रिय पोस्ट