ऐकावे जनाचे करावे मनाचे
धवलपूरचा धोबी त्याचे गाढव विकण्यासाठी बाजाराच्या गावी निघाला बरोबर मुलालाही घेतले. धोबी, मुलगा आणि गाढव तिघेही पायी चालले होते. त्यांना पाहून एक वाटसरू म्हणाला, "गाढव असताना मुलाला का पावी चालवतोस ? त्याला गाढवावर बसव धोब्याने लगेच मुलाला गाढवावर बसवले. थोडे अंतर जातात तोच आणखी एक वाटसरू म्हणाला, "अरे पायी चालतोस तूही बस ना!" झाले. धोबी पण गाढवावर बसला. बिचारे तू का गाढव रखडत रखडत चालू लागले. ते पाहून लोक म्हणाले, "खरे तर यांनी गाढवाला चालवायला नको; पण हेच गाढवावर बसले किती निर्दयी आहेत.' धोबी व मुलगा लगेच गाढवावरून उतरले; पण गाढवाला न चालवता कसे न्यायचे?
धोब्यास एक युक्ती सुचली त्याने एक बांबू आणला. गाढवाचे पाय बांधले. पायातून बांबू घालून गाढव उलटे टांगून, पुढे तो मधे गाढव व मागे मुलगा असे बांबू खांद्यावर घेऊन चालले. वाटेत नदीवर एक पूल होता. पुलावरून जाताना, गाढवास खाली पाणी दिसले ते धडपडू लागले आणि नदीत पडून मेले.
बोध/ तात्पर्य
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in