मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

गुप्तदान' हेच श्रेष्ठ दान....

 पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ' जिल्हा परिषद शाळेत' आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते.


सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता - "दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे."

शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.


त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.

तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते - एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायाला एक जुनी चप्पल होती.


सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, "हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?"

त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.


सुहासराव रागाने कुजबुजले, "सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. 'स्टँडर्ड' खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा."

मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, "साहेब, ते... ते..."


सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. "अहो, कसले 'ते'? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना."

शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव 'तात्या' होतं) हाताला धरून उठवलं.


"तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा."

तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.

कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.

शेवटी भाषणाची वेळ आली.

मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.

ते म्हणाले:


*"आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं 'सर्वस्व' दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.

सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही 'भिकारी' समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना...

ते 'तात्या पाटील' आहेत.

या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे... ती जमीन या तात्यांनी शाळेला 'दान' दिली आहे.


तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.

म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेंन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.

साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.

या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.


खरा 'श्रीमंत' कोण, हे आज तुम्हीच ठरवा."*

सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.

सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

ज्या माणसाला ते कपड्यावरून 'भिकारी' समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.


सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.

सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.

तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.


सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.

"मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे 'राजा' आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली."

तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.

"अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं... हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे."


सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.

आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती 'देण्याच्या' वृत्तीमध्ये असते.

त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.


कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. 'गुप्तदान' हेच श्रेष्ठ दान आहे.🙏👏

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

सुसंवाद....

मानवी जीवन हे अतिशय गुंतागुंतीचे होत चालला आहे. प्रत्येक जण आपल्या अहंकाराच्या पायी वाद निर्माण करत आहे वाद निर्माण केल्याने आनंद कमी होऊन दुःखामध्ये वाढ झाली. म्हणून 

वाद नको, सुसंवाद हवा.....


'शब्द हे शस्त्रही आहे आणि शास्त्रही.' आपण शब्दांचा वापर कसा करतो, यावर आपल्या जीवनातील सुखाचे गणित अवलंबून असते. आजच्या धावपळीच्या युगात माणसाचा संयम कमी होत चालला आहे. त्यातूनच संवाद कमी होऊन 'वादा'चे प्रसंग अधिक उद्भवू लागले आहेत. खरं तर, प्रगतीसाठी चर्चा हवी, पण ती वादाच्या स्वरूपात नसावी तर ती सुसंवादाच्या रूपात असावी.

वाद म्हणजे दोन विचारांमधील संघर्ष. वादात अहंकाराचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असतो. "मीच कसा बरोबर आहे आणि समोरचा कसा चुकीचा आहे," हे सिद्ध करण्याच्या नादात आपण समोरच्या व्यक्तीचा आदर विसरतो. याउलट, सुसंवाद म्हणजे दोन मनांचे मिलन. सुसंवादामध्ये "काय बरोबर आहे" हे शोधण्यावर भर दिला जातो. वाद हा नाती तोडतो, तर सुसंवाद तुटलेली नाती जोडण्याचे काम करतो.

सुसंवादाचे महत्त्व:

कुटुंब असो वा समाज, सुसंवाद ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. घरामध्ये जेव्हा वडीलधारी माणसे आणि मुले यांच्यात सुसंवाद असतो, तेव्हा पिढीतील अंतर (Generation Gap) कमी होते. कामाच्या ठिकाणी जेव्हा सहकारी एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, तेव्हा कामाचा ताण कमी होऊन उत्पादकता वाढते. जगातील मोठे प्रश्न युद्धातून सुटत नाहीत, तर ते शांततेच्या चर्चेतून म्हणजेच सुसंवादातून सुटतात.

सुसंवाद साधण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'ऐकून घेणे'. जोपर्यंत आपण समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकत नाही, तोपर्यंत आपण त्याला समजू शकत नाही. बोलताना शब्दांची निवड सौम्य असावी. शब्दांना धार नसावी तर आधार असावा. आपली चूक असल्यास ती मान्य करण्याचा मोठेपणा दाखवल्यास वादाचा जागी सुसंवाद आपोआप प्रस्थापित होतो.


शेवटी, वाद हा अंधारासारखा असतो जो फक्त द्वेष वाढवतो, तर सुसंवाद हा प्रकाशासारखा असतो जो मार्ग दाखवतो. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, माणसं जिंकण्यासाठी वाद जिंकून चालत नाही, तर मने जिंकावी लागतात. म्हणून, आयुष्याच्या प्रवासात आनंदी राहायचे असेल, तर 'वादाला' निरोप देऊन 'सुसंवादाची' कास धरणे गरजेचे आहे.



केंद्रप्रमुख परीक्षा हॉल तिकीट 2026

 *केंद्रप्रमुख परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड 

आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाका..

Captcha code taka आणि डाऊनलोड करा..user name ani passward विसरला असेल तर फॉर्गेट पासवर्ड क्लिक करा...

 http://ibpsreg.ibps.in/mscepoct25/oecla_jan26/login.php?appid=3c65be7a65d2e51e2f011e327cdb21ed

लोकप्रिय पोस्ट