मनःपूर्वक अभिनंदन अभिमानास्पद कामगिरी..
ग्लासगोला सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानूने इतिहास घडवला आहे. तिने रविवारी (२६ जुलै) सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे.
२०१८ गोल्ड कोस्ट आणि २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. तिने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते.
