मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

NMMS exam 2026...

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ इ. ८ वी साठी


सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.


इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.


१. अर्ज करण्याची पध्दत दिनांक ०८/०९/२०२६ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in

 https://mscenmms.in 

या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध


२. पात्रता :-


3/5


a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.


b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.


c) विद्यार्थी/विद्याथ्यर्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)


d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.


विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.


केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.


जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्याथी


शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी,


सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


३. विद्याध्यर्थ्यांची निवड विद्याथ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.


परीक्षेचे वेळापत्रक: महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २० डिसेंबर, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे..


* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)


५. परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील. प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.


a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.


b) शालेय क्षमता चाचणी (SAT): ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात,


> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.


सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.


b. समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण


८. गणित २० गुण.


६. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.


७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या: अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे.

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

रहस्य आनंदाचे...

 


रहस्य आनंदाचे...


मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण एकटे सुखी राहू शकत नाही. आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या सुख-दुःखाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. म्हणूनच “दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणे” ही जीवनातील अत्यंत सुंदर भावना आहे.


एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य पाहणे, एखादा व्यक्ती आजारी आहे त्यावेळी केलेली मदत,एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य देणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे किंवा एखाद्याच्या यशाचे मनापासून कौतुक करणे—या छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपल्यालाही मोठा आनंद मिळतो. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी नेहमी मोठे काम करण्याची गरज नसते. प्रेमाचे दोन शब्द, आपुलकीची विचारपूस आणि योग्य वेळी केलेली छोटीशी मदतही कोणाच्या तरी जीवनात आनंद निर्माण करू शकते.


आजच्या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याच्या यशाकडे पाहताना मत्सर करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. मात्र दुसऱ्याच्या यशाचा आनंद मनापासून साजरा केला, तर आपले मन अधिक सकारात्मक आणि आनंदी बनते. दुसऱ्याला खाली खेचण्यात नव्हे, तर त्याला पुढे जाण्यास मदत करण्यात खरा आनंद आहे.


शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आनंद मानणे, पालकांनी मुलांच्या छोट्या यशाचे कौतुक करणे, मित्रांनी एकमेकांना अडचणीच्या वेळी साथ देणे आणि समाजातील प्रत्येकाने गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे—यातून समाजात प्रेम, सहकार्य आणि माणुसकी वाढते.


आनंद ही अशी गोष्ट आहे की ती वाटल्याने कमी होत नाही; उलट वाढत जाते. आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणले, तर त्या हास्याचा आनंद आपल्या मनातही उमटतो. म्हणूनच जीवनात केवळ “मला काय मिळेल?” असा विचार न करता “मी दुसऱ्याला काय देऊ शकतो?” असा विचार केला पाहिजे.


शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते—


दुसऱ्याच्या डोळ्यांतील आनंदाची चमक आपल्या मनाला समाधान देते. दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचा आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे.


“स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा; कारण दुसऱ्याच्या आनंदातच आपल्या आनंदाचे खरे प्रतिबिंब असते.”


विजयकुमार किसन भुजबळ 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट अलंकारिक शब्द आधारित टेस्ट...

html = r''' अलंकारिक शब्द — 20 प्रश्नांची टेस्ट

📚 अलंकारिक शब्द — प्रश्नमंजुषा

२० बहुपर्यायी प्रश्नांची सराव चाचणी

प्रत्येक प्रश्नाला १ गुण

सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी एक योग्य पर्याय निवडा आणि शेवटी “टेस्ट तपासा” बटण दाबा.
उत्तर दिले: 0 / 20
🟢 बरोबर उत्तर    🔴 चुकीचे उत्तर

१. ‘अकरावा रुद्र’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?

२. ‘अक्कलेचा कांदा’ म्हणजे काय?

३. ‘अक्कलेचा खंदक’ या शब्दाचा अर्थ कोणता?

४. ‘अडेलतट्टू’ म्हणजे कोण?

५. ‘अष्टपैलू’ या शब्दाचा अर्थ कोणता?

६. ‘अक्षरशत्रू’ म्हणजे कोण?

७. ‘अहिल्याबाई’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

८. ‘उंटावरचा शहाणा’ म्हणजे कोण?

९. ‘कर्णाचा अवतार’ म्हणजे कोण?

१०. ‘कपिलाषष्ठीचा योग’ म्हणजे काय?

११. ‘कर्दनकाळ’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?

१२. ‘कवडीचुंबक’ म्हणजे कोण?

१३. ‘कळीचा नारद’ म्हणजे काय?

१४. ‘काडीपहलवान’ म्हणजे कोण?

१५. ‘कुंभकर्ण’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

१६. ‘कुबेर’ म्हणजे कोण?

१७. ‘कूपमंडूक’ म्हणजे कोण?

१८. ‘खडाजंगी’ म्हणजे काय?

१९. ‘चाणक्य’ म्हणजे कोण?

२०. ‘जमदग्नीचा अवतार’ म्हणजे कोण?

🎉 चाचणीचा निकाल

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

INSPIRE-MANAK सन 2026-27 करिता नामांकने

 


*विषय: INSPIRE-MANAK सन 2026-27 करिता नामांकने सादर करण्याबाबत - मुदत 15 सप्टेंबर 2026 National Innovation Foundation - India यांचेकडून INSPIRE-MANAK 2026-27 साठी ऑनलाईन नामांकने सुरु आहेत. अंतिम मुदत *15 सप्टेंबर 2026* आहे.


1. प्रत्येक शाळेने त्यांचे 5 सर्वोत्तम विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना/नवोपक्रम (Ideas)

 http://www.inspireawards-dst.gov.in पोर्टलवर तातडीने अपलोड करावेत.

2. विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांचा सहभाग वाढवावा.

3.  दि. 10 सप्टेंबर पर्यंत 100% नामांकन पूर्ण करावे.

 राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

रक्षाबंधन सणावर आधारित टेस्ट...

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा

🎀 रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 🎀

20 गुणांची ऑनलाइन चाचणी | प्रत्येक प्रश्न 1 गुण
1) रक्षाबंधन हा सण कोणत्या नात्याचे प्रतीक आहे?
2) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर काय बांधते?
3) रक्षाबंधन सण कोणत्या महिन्यात येतो?
4) रक्षाबंधनाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
5) रक्षाबंधन कोणत्या तिथीला साजरे केले जाते?
6) राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला काय देतो?
7) रक्षाबंधनाचा मुख्य संदेश कोणता आहे?
8) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला काय करते?
9) राखी कोणत्या नात्याचे बंधन दर्शवते?
10) रक्षाबंधन हा कोणत्या प्रकारचा सण आहे?
11) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधताना कोणती भावना व्यक्त करते?
12) रक्षाबंधनाच्या दिवशी प्रामुख्याने कोणता धागा बांधला जातो?
13) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर काय लावते?
14) रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबात कोणती भावना वाढीस लागते?
15) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधल्यानंतर काय करते?
16) रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीबद्दल काय भावना ठेवावी?
17) रक्षाबंधन हा सण कोणता संदेश देतो?
18) रक्षाबंधनाच्या सणात राखी कशाचे प्रतीक मानली जाते?
19) रक्षाबंधनामुळे कोणता सामाजिक गुण वाढीस लागतो?
20) रक्षाबंधनाचा सण आपल्याला काय शिकवतो?

लोकप्रिय पोस्ट