blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

जमिनीची गरज

  माणसाला किती जमिनीची


जरुरी आहे ?

जानोजी नावाचा शेतकरी होता. आपले खूप मोठे शेत असावे असे त्याला वाटे. त्याच्या वाचनात एक जाहिरात आली 'शेतकरी असणाऱ्यास जमीन देणे आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून जाल, तेवढी जमीन तुमची.' जानोजीला त्याची इच्छा पूर्ण करणारी संधी चालून आली. दिलेल्या पत्त्यावर जानोजी हजर झाला. ठीक सूर्योदयास त्याने चालावयास सुरुवात केली सूर्य डोक्यावर येईपर्यंत जानोजीने बरेच अंतर कापले होते. आता त्यास सूर्यास्तापर्यंत पूर्वीच्या ठिकाणी पोचावयाचे होते. म्हणजे तो घालून झालेली, सर्व जमीन त्याची होणार होती जानोजीने विचार केला, आपण आणखी पुढे जाऊन, मग मागे फिरू म्हणजे आतापेक्षा आणखी जमीन आपल्या मालकीची होईल. तो तसाच पुढे निघाला.  

 

सूर्य मावळतीला आला, तसा तो नाईलाजाने मागे फिरला. त्याने आपला चालण्याचा वेग वाढवला. खरे तर तो आता दमला होता, पण त्याचा नाईलाज होता त्याला आता अधिक अंतर काटावयाचे होते. सूर्यास्तापूर्वी निघण्याच्या ठिकाणी आपण पोचणार नाही. असे त्यास वाटू लागले म्हणून त्याने धावावयास सुरुवात केली. सूर्यास्तास जीवाच्या आकांताने त्याने सुरुवातीचे ठिकाण गाठले पण अतिश्रमाने तोतेथेच कोसळला आणि गतप्राण झाला. गावकऱ्यांनी त्याला पुरण्यासाठी खड्डा खणला आणि म्हणाले, खरे तर याला येवढ्याच जमीनीची जरुरी होती, असे म्हणून त्यास मूठमाती दिली.


बोध  तात्पर्य 

अति लोभ विनाशकारी असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.