blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

महान विज्ञान वादी संत......नक्की वाचा

 एकदा एका ठिकानी दशक्रिया विधी चालु असतो. लोक अजुबाजुला बसलेली असतात. घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात. शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो. एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात. 

आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथं येतो आणी भटजी कडे विनवणी करतो की 

मला खुप भुक लागली आहे. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही 

माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातिल एक गोळा मला द्या . हे ऐकुन भटजी संतापतो. भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात. 

तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. 

अहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. 

त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. 

म्हातारा तरी ऐकेना !

म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. 

मग म्हातारा म्हणतो 

स्वर्ग कुठ आहे. 

भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात. 


दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. 

सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात 

ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ?

हे काय करतोय? 

त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो

"बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला

पाणी नाही म्हणून पाणी देतोय. ..

लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी ?

म्हातारा म्हणतो 

अमरावतीला....

लोक म्हणतात कुठं आहे

अमरावती? 

म्हातारा म्हणतो 

खुप लांब आहे अमरावती....

लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात

"आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय... आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल .

यावर म्हातारा म्हणतो 

इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा

भटजी पोचवत असेल तर 

मी टाकलेल पाणी माझ्या 

शेताला का मिळणार नाही? 


हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या

पायावर डोकं ठेवतात. 


हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर...!

एकही दिवस शाळेत न

गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हा होता...


वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील 

मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो. 

म्हणुनच म्हणतो दैववादी होण्या पेक्षा विज्ञान वादी 

व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणी दरिद्री राहतील..... 


धन्यवाद .... शेअर......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.