मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

परिपूर्णता

 


परिपूर्ण कोणी नसतं


मित्रांनो, प्रत्येक माणूस हा आपापल्या क्षेत्रात पारंगत असतो. एखादा उत्तम वक्ता असेल तर त्याला आपल्या कार्यक्रमाचे उत्तम मार्केटिंग करता येईल असे नव्हे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी करायचे असतील तर त्या व्यक्तीने मार्केटिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाशी पार्टनरशिप करणे आवश्यक असते. तर ती ट्रेनिंग कंपनी पुढे जाऊ शकते. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्याला वेगवेगळे करार करावे लागतात. सल्ला घ्यावा लागतो. हे एक साहचर्य आहे. एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका गावात एकत्र भेटतात. गप्पा मारू लागतात. आंधळ्याला नीट दिसत नसते. त्यामुळे त्याला रस्ता पार करता येत नाही. काही लबाड लोकही त्याला काही वेळेला कमी पैसे टाकून जास्त पैसे घेऊन त्याला फसवतात. लंगड्या माणसाला चालता येत नाही. थोडं चाललं की, त्याला खूप त्रास होतो. मग हे दोघेही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तयार होतात, आणि लंगडा भिकारी आंधळ्याच्या खांद्यावर बसतो. दमल्यानंतर दोघेही एका झाडाखाली बसतात. आणि मिळालेले पैसे दोघेही वाटून घेतात. दोघे एकमेकांनो खूप मदत करतात. त्यांनी एकमेकांना एकमेकांच्या शक्ती दिल्या. त्यामुळे त्यांचे आयुष्य खूप छान चाललेले आहे. मित्रांनो, या जगात कोणीच परिपूर्ण नसतो. जे आपल्याकडे नाही, त्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायची असते. जे आपल्याकडे आहे व दुसऱ्याकडे नाही त्याला आपण मदत करायची.

- डॉ. दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर


शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

शब्दांचा आधार

 व्यक्तीला जीवनात विविध प्रकारे सहाय हवे असते. सहाय म्हणजे मदत, आधार! हा आधार असतो पैशाचा, श्रमाचा. परंतु याहीपेक्षा एक वेगळा आधार असू हकतो की, ज्यात पैसा किंवा श्रम खर्ची पडत नाहीत पण खर्ची पडतो फक्त विचार! हा विचार शब्दांच्या सहायाने आपण व्यक्त करतो; म्हणून त्यास आपण 'शब्दांचा आधार' असे संबोधतो.


वेलीला जसा वृक्षाचा आधार गरजेचा असतो, मुलांना आई-वडिलांचा विद्यार्थ्यांला शिक्षकांचा, अनुयायाला नेत्याचा, साधकाला गुरूचा तसे भांबावलेल्या, वैतागलेल्या, हताश झालेल्या, दुःखाने होरपळलेल्या मनाला शब्दाचा आधार फार मोठा वाटतो.


वृक्षाच्या आधाराने जशी वेल फोफावते तशी माता-पिता यांच्या 'आम्ही आहोत, चल पुढे' या शब्दांच्या आधाराने मुले जीवनातील चढ-उतारांशी मुकाबला करू शकतात. कधी कधी त्यांना मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या विजयानेही आपण म्हणतो, 'शाबास, विजयी भव' लढाईवर जाणाऱ्या मुलाला आई जेव्हा ओवाळते तेव्हा तिच्या मुखातून बाहेर पडलेल्या 'औक्षवंत हो!" 'जयवंत हो!' 'कल्याण असो!' किंवा 'पुन्हा प्रयत्नाला लाग' अरे अपयश ही यशाची पायरी असते' अशा शब्दांचा आधार त्याला पृथ्वीमोलाचा वाटतो. या शब्दाच्या आधारानेच त्यांना प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. परिणामतः ते विजयाची वाटचाल करू शकतात.


या उलट कधी कधी संकटग्रस्तांचे अडचणीत सापडलेल्यांचे किंवा दुःखद प्रसंगी आपण एखाद्याचे सांत्वन करतो "या जगात तुम्हीच फक्त दुःखी आहात, अस का

तुम्हाला वाटतं?” अशा शब्दांच्या आधाराने आपण केलेल्या सांत्वनामुळे त्या व्यक्तीला, कुटुंबाला आधार मिळतो. हा शब्दांचा आधार मोठा वाटण्याचे कारण म्हणजे या शब्दांच्या मागे मोठी शक्ती उभी असते. त्यामुळे त्या असहाय, संकटग्रस्त व्यक्तीला आपण या जगात एकटे नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, याची जाणीव होते व हीच भावना संकटातून पार पडण्यास त्या व्यक्तीस मदत करीत असते.


 शब्दांचा आधार देताना आपल्याला विचार करावा लागतो, पैसा खर्च करावा लागत नाही. या विचारांच्या शब्दांच्या आधाराने मानवी जीवन फुलू शकते, निराशा संपते, प्रेरणा मिळते. म्हणूनच हा शब्दांचा आधार मौल्यवान होऊ शकतो 

म्हणून अडचणीच्या वेळी द्या शब्दांचा आधार..........🙏🙏🙏🙏🙏🙏

.

लोकप्रिय पोस्ट