मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, २१ जानेवारी, २०२४

प्रामाणिकपणा


     

   महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली... गुरू द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?

कृष्णाने उत्तर दिले...

     "ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले..."

रुक्मिणीने विचारले...

कोणते पाप ? कृष्ण म्हणाला...

     "जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते...

दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते...

पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."

रुक्मिणीने विचारले...

मग कर्णाचे काय?? कृष्ण म्हणाला,

    "कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही... त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.

पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.

    तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते...

पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही...

    नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."...


      तात्पर्य....

    तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक पणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.....!!!


   *आयुष्यभराची प्रतिष्ठा.....!!

 *एका क्षणात शुन्य होते......!!


गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

गोतावळा

 गोतावळा ......


           आज हा गोतावळा शब्द नव्या पिढीला माहित असेल की नाही असा प्रश्न पडतो. आजची परिस्थिती इतकी बदलली आहे की जो तो आपल्या स्वतःच्या कुटुंबापूरता संकुचित झाला आहे 

काका, आत्या, आजोबा, आजी, मावशी,मामा, मामेभाऊ, आत्येभाऊ ही नाती इतकी दूर गेली आहेत की अनेकांना या नात्यांची ओळख ही आहे की नाही , अशी शंका येते.

       चाळीस पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत घर माणसांनी भरलेलं असायचं, घराला घरपण होतं. शेजारी पाजारी लोकांची ये- जा असायची. गल्लीतल्या त्या टोकाच्या जाधवांच्या घरची केलेली भाजी वाटीत घालून खालच्या गल्लीतल्या चव्हाणांच्या घरी पोहोचायची. जादा पाहुणे घरी आले की, साखर, च्याची पावडर (चहा पावडर), पीठ उसणवारीनं एकमेकांना दिलं घेतलं जायचं. माणसांमध्ये आपूलकी, प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आत्मियता होती. उगवतीच तांबडं फुटायला घराच्या अंगणात शेणाचा सङा पडायचा. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पक्षांची कीलबील अन् गावातील मंदीरातून आरतीचा सूर आणि सुरेल घंटानाद मनाला प्रसन्न करायचा. भल्या पहाटे घरातल्या गृहलक्ष्मीची कामाची लगबग सुरू व्हायची, आंघोळ पाणी उरकून दिवस उजडायला सोनेरी कोवळी सुर्यकिरणं अंगणात पडायच्या वेळेला दारातल्या तुळशी वृंदावनातील हिरव्यागार कृष्णधवल तुळशीला पाणी आणि सुर्यदेवाला अर्ध्य देऊन मनोभावे नमस्कार व्हायचा. सकाळी सुर्य उगवतीला आला की , गोठ्यातील हंबरणारी वासरं अन् पान्हा सोडलेल्या गायींच्या गळ्यातील घुंगूरमाळांचा किणकिणाट वातावरणात प्रसन्नता निर्माण करायचा. आकडी दुधानं आणि दुधाच्या फेसाने प्रत्येकाच्या घरातील चरवी काठोकाठ भरलेल्या दिसायच्या.


           सुर्य डोक्यावर येऊ लागला की, घरातील वयस्कर आजीच्या बांगङ्याचा खूळ खूळ आवाज कानावर पडायचा, तीच्या हातातली रवी एका विशिष्ट लयीत मोठ्या गाडग्यातल्या गोडश्या दह्यावर गोलगोल फिरत रहायची, घरच्या दह्यातूंन कणीदार ताक तयार व्हायचं, निरसं‌ ताक घुसळून पांढराशुभ्र लोण्याचा भलामोठा गोळा जमा व्हायला वेळ लागायचा नाही. आजीच्या मागे मागे स्वंयपाक घरात म्यावं...म्यावं... करत शेपूट हलवत फिरणारी मनीमाऊ लोण्याच्या गोळ्याकडं बघत कानोसा घेत फिरायची. घरावरील छपराच्या सावण्यातनं (आता सावणं कालबाह्य झालं) सुर्याचा लख्खं प्रकाश घर उजळून टाकायचा. एव्हाना चुलीवर जर्मनच्या डिचकीत लोणी कढवायला ठेवलं जायचं. लोणी कढल्यावर तुपाचा घमघमाट अख्ख्या गल्लीभर व्हायचा. घरातली कर्तीधर्ती माणसं सकाळी सकाळी मळ्यात पोहोचलेली असायची. घरातील सुनाबाळा सासरे मामांजीच्या व सासूबाई आत्याचे चरणस्पर्श करून दिवसाच्या कामाला सुरुवात करायच्या. लहान मुलं उन्हं तोंडावर पडली की, आपसूकच वाकळातून (वाकळं किंवा गोधडीही आता कालबाह्य झाली आहेत.) आळोखेपिळोखे देत डोळं चोळत अंथरूणातून बाहेर पडायची. तान्ह्या बाळांच्या आया त्यांना जवळ घेऊन माजघरात पाजायला पदराआड घ्यायच्या. आंघोळीसाठी सकाळी सकाळी भरलेला पाण्याचा रांजण रीकामा व्हायचा. धुण्याचा भला मोठा बोचका न्हानीतनं घेऊन परटीणंमावशी गावतळ्याकङं निघायची.ती घरात आली की, पहिल्यांदा तिला चहापाणी, काहीतरी खायला दिलं जायचं, घरचं आणि बाहेरचं असा भेदभाव बिलकुल पहायला मिळत नव्हता. एकमेकांविषयी कमालीचे प्रेम, जिव्हाळा,आदर होता. अर्थात बैतेसुध्दा घरातली असल्यासारखी असायची. त्यांनी केलेल्या कामासाठी भरपूर मोबदला दिला जायचा. त्यामुळे ही नाती अधिक घट्ट होत होती. पैपाहूणे यांचे एकमेकांच्या घरात सर्रास येणं जाणं असायचं. प्रत्येकाची थेट स्वयंपाक घरात एन्ट्री असायची.

          घरातल्या कर्त्या माणसांचा सगळीकडेच दरारा असे, सर्वजण त्यांचा आब राखत असत. त्यांचा आदर करीत असत. कुटुंबातील संस्कार हे प्रत्येकाच्या वागण्यातून दिसून यायचे. आई - बाबा, काका - काकू , आज्जी - आजोबा, आत्या - मामा ,भाऊ - बहिणी , चुलत भाऊ ,चुलत बहीणी हा सगळा "गोतावळा " म्हणजे घराचे खरे वैभव होते. घराच्या ओसरीला बसून दिवसभराच्या कामाचे नियोजन केले जायचे. बैलाकङे कोण जाणार ? माळावर कोण ? नातेवाईकांच्या लग्नाला, कार्यक्रमाला कोण ? हे सगळं नियोजनानंतर घरातील कर्त्या माणसांकङून एकमेकांविषयीचे रूसवे - फुगवे दूर केले जायचे. मध्येच कोणाचे हट्ट पूरवण्यासाठी योग्य ती तजवीज केली जायची. तर मध्येच घरातील लग्नाला आलेल्या उपवरं मुलीच्या लग्नाची चर्चा रंगली की, मुली लाजून चूर व्हायच्या अन् तिथून आत माजघरात पळून निघून जायच्या. प्रत्येकाची सुख दु: ख समजून घेतली जायची. मोठ्या मनानं कौतुक केले जायचे. त्यामुळे मनं मोकळी मोकळी व्हायची. प्रत्येक जण कुटुंबासाठी राबायचा, खपायचा. तीस चाळीस सदस्य असलेली कुटूंबं गुण्यागोविंदानं नांदायची. 

       नवरा जेवल्याशिवाय बायकांना घास उतरत नसायचा. अपेक्षा कमी असल्याने माणसं सुखी समाधानी अन् आनंदी असायची. घरात एखादा छोटा मोठा समारंभ असला की आनंदाला उधाण यायचं. घराच्या भिंती ही बोलू लागायच्या. लहान मुलांमुलींची‌ घरभर खेळाची रेलचेल चालायची. कधी कधी बच्चेकंपनी इतका दंगा करायचीत की, घर जणू डोक्यावर घ्यायचीत. घरातल्या सुना स्वयंपाकात दंग असायच्या. सर्जा राजाची बैलजोडी बांधलेल्या बैलगाडीतनं मध्येच नांदायला गेलेली गल्लीतील एखादी लेक हातात हिरवागार चूडा भरुन अन् हिरव्याजर्द नऊवारी पातळ नेसून एखादी लक्ष्मी प्रगट व्हावी,तशी यायची. अन् मग घरातल्या प्रत्येकाच्या गळ्यात पडून भेटायची. आपूलकीचा स्पर्श नात्यातील वीण अधिक घट्ट करायचा. शेजारच्या आयाबाया हातातली कामं टाकून माहेरवाशिणीला भेटायला न बोलवता यायच्या. गालावर हात फिरवून बोट कडाकडा मोडून प्रत्येकजणी माया करायच्या . प्रत्येकीच्या काळजातून थेट ओठांवर मायेचे शब्द यायचे, विचारपूस केली जायची. गावातली लेक आली म्हणून सगळ्या मैत्रिणी गोळा व्हायच्या. माहेरपणासाठी आलेल्या लेकीचं आख्खा गाव कोडकौतुक करायचा. 

       आत्या मावशी ही नाती इतरांपेक्षा ही कांकणभर जवळची वाटायचीत. नणंद -भावजया मधील प्रेम अतूट होत. स्वार्थ अन् अहंकाराचा लवलेश ही नसायचा . दुपारी जेवणं झाल्यावर जात्यावर धान्य दळायला घरातल्या बायका बसायच्या, त्यावेळी जात्यावरच्या ओव्या आपसूकच ओठांवर यायच्या, एका सुरात गायिलेल्या ओव्या कानावर पडल्यावर‌ शेजारणी ही आवतण न देता जात्यावर येऊन बसायच्या. घ‌रच्या सुनेच्या काबाडकष्टाची जाण असायची. शेतावरून घरी आलेल्या मामांजीना तांब्याभर पाणी देताना सूनबाईच्या डोळ्यातून घळकनं अश्रू ओघळायचे. मग मात्र मायेनं सुनेच्या ङोक्यावरनं फिरवलेला हात बापाची आठवण करून द्यायचा. एकमेकांविषयीच्या सुख दु:खाना प्रत्येकाच्या मनात थारा होता. संध्याकाळच्या जेवणाची तयारी तिन्ही सांजेला सुरू व्हायची. संध्याकाळच्या‌ स्वयंपाकासाठी घरच्या मोठ्या बायकांची लगबग स्वयंपाकघरात सुरू झालेली असायची. घरातील प्रत्येक सदस्य आल्यावर ओसरीला पंगत बसायची. अन् पुन्हा घरातील विविध विषयांवर चर्चा व्हायची. बाप - लेक , नवरा - बायको , आज्जी - आजोबा नात्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना प्रेम लावायचे. सुख- दु:ख वाटून घ्यायचे. 

   मोठी माणसं लहानांची थट्टामस्करी करायचे, त्यावेळी सगळ्या घरात एकच हश्या पिकायचा. दिवसभराचा शीणं निघून जायचा. त्यावेळच्या बायकांना नवऱ्याचा मूड आनंदी ठेवण्याची कला अवगत होती. त्यामुळे वातावरण खेळकर असायचे. यातून घराचं गोकुळ व्हायचं. संसार सोन्यासारखा असायचा. एकत्र कुटुंब ही चांगल्या संस्काराची केंद्रं होती. माणसात माणूसपण टिकून होतं. सुख - दु:ख रिते करायला अधिकाराचे अन् हक्काचे खांदे होते. नात्यातील प्रेमात अविट गोडवा होता. प्रत्येक क्षणाला आपलेपणाची किनार होती. या सगळ्या गोतावळ्यात शब्द अन् तत्वांना किंमत होती. एकमेकांविषयी विश्वासार्हता टिकून होती. कुटुंबासाठी प्रत्येक माणूस सुख दु:खाच्या प्रवासातील वाटेकरी होता. भरलेल्या घरातल्या एखाद्या माणसांना न परतीच्या वाटेकडे "एक्झिट" घेतली तर अशा दुःखद प्रसंगी माणसं माणसांना भरभक्कम आधार द्यायचीत.भावनांना वाट मोकळी करून द्यायला जो तो आपला पदर पुढे करायचा. त्याची कायम आठवण रहावी म्हणून त्यांच्या नावाने वर्षाला श्राद्ध घालायचे. पैपाहुण्यांसाठी जेवणावळी घातल्या जायच्या. रक्ताची नाती सोडाचं पण मानलेली नाती ही अशावेळी घरातून पाय काढायची नाहीत. जाती धर्माच्या पलीकडे ही नाती जपली जायची,जात, धर्म वेगवेगळा असलातरी त्याची पुसटशी सावली सुध्दा एकमेकांच्या संबंधांवर पडली जात नव्हती,

    ‌असा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा "गोतावळा" अलिकडच्या काळात दूर्मिळ व दुरापास्त झाला आहे, त्यामुळे समाजाची घडी विस्कटून गेली आहे. प्रत्येक माणूस एकटा एकटा पडला आहे. कुणाचा कुणाला आधार नाही. त्यातही पराकोटीचा स्वार्थ, आप्पलपोटेपणा आणि कमालीची स्पर्धा सुरू झाली आहे, प्रत्येक गोष्टीत इव्हेंट आणि बाजारीकरण झाले आहे, त्यामुळे असुरक्षितता व एकटेपणाचा फास दिवसेंदिवस गच्च आणि घट्ट होत चालला आहे, तो प्रत्येक माणसाला जाणवत आहे, पण सामाजिक परिस्थिती इतकी झपाट्याने बदलत आहे की, त्याला कुठलाच इलाज राहिलेला नाही,समाज दिशाहीन झाला आहे,मी आणि माझे यापलीकडे जाऊन पहायला कुणालाही वेळ नाही, त्यामुळे समाजाची संवेदनशीलता पुर्णपणे संपली आहे, माणूस माणसापासून दूर गेला आहे, त्यामुळे नातीगोती कुठल्या कुठे गडप झाली आहेत, हे भयानक वास्तव समोर आले आहे.

      "गोतावळा हा शब्दच कालबाह्य झाला आहे," हे नको असणारे सत्य स्विकारण्याशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही.

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

क कमाल ध धमाल

 





*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर*  तालुका कोरेगाव जिल्हा सातारा 

मधील बालचमुंचा आकाशवाणी 

 *सातारा* केंद्रावरती 📻📻📻📻


 *क कमाल ध धमाल*  भाग 2


 हा कार्यक्रम रविवारी दिनांक 21/01/2024 रोजी  सकाळी 9.30 मिनिटांनी प्रसारित होणार आहे तरी सर्व बालकांनी पालकांनी सर्वांनी याचा आनंद घ्यावा...🙏🙏🙏🙏🙏 


भाग 1 चे रेकॉर्डिंग खालील लिंक वरून नक्की ऐका


https://drive.google.com/file/d/1AkImFT-2O-WzpPAsX9HeFOxcvhNvk-Vm/view?usp=drivesdk


धन्यवाद आकाशवाणी सातारा केंद्र 




शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

स्वामी विवेकानंद

 


               *स्वामी विवेकानंद*

                (नरेंद्रनाथ दत्त)

             (भारतीय हिंदू गुरु)


    *जन्म : १२ जानेवारी १८६३*

(कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

    *मृत्यू : ४ जुलै १९०२*

(बेलूर मठ, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : ब्रिटीश भारत

शिक्षण : कला शाखेत पदवीधर

प्रशिक्षणसंस्था : कलकत्ता विद्यापीठ

धर्म  हिंदू

वडील : विश्वनाथ दत्त

आई : भुवनेश्वरीदेवी दत्त

                     स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.                                                                       💁🏻‍♂️ *बालपण*                                                                     उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३2 वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

📖 *शिक्षण संपादन*

नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.


नरेंद्रनाथांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही." त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.


🤝 *गुरु रामकृष्ण यांची भेट*

कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.


⚜️ *नरेंद्राची साधना*

              अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.


🤝 *गुरुभेट व संन्यासदीक्षा*

याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.


🚩 *धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात*

रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.


🛡️ *‘विवेकानंद’ नामकरण*

राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.


🛕 *कन्याकुमारी*

रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.


🏮 *शिकागोतील सर्वधर्मपरिषद*

             सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.


🏯 *समाधी*

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.


💎 *तत्त्वविचार आणि शिकवण*

 स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.


त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.

प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.

अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.

कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.

उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

'दरिद्री नारायण' हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.

त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -"मित्रास"; ,इंग्लिश - "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:

देवनागरी लिप्यंतरण:

बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि

कोथाय खूंजिछो ईश्वर

जीवे प्रेम करे जेई जन

सेई जन सेविछे ईश्वर


अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. 


♻️ *आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती*

ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—

१.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

२.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.

४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.

त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)


🎯 *कर्मयोग*

अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या एकूणेक दु:ख-क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.


🎯 *ब्रह्म संंकल्पना*

अद्वैत तत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.


🎯 *भक्तियोग*

भक्तियोग म्हणजे खऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.


🎯 *शिक्षण संदर्भातील विचार*

शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.


📚 *प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके*

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-

अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)

मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)

राष्टद्रष्टे विवेकानंंद : (वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)

शोध स्वामी विवेकानंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर)

संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))

स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)

स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)

स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)

📜 *नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार*

पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)

पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)

शंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)

पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)

विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.

विवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.

🔮 *भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहरूंचे पीए एम.ओ. मथाई यांना म्हणाले होते की, "अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत, गांधी नव्हे."

सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, "जोपर्यंत बंगालचा संबंध आहे, आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे 'आध्यात्मिक पिता' म्हणू शकतो."

स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.


मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -

त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .

निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .

भारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.

पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.


         

राजमाता जिजाऊ



           *राजमाता जिजाऊ*

   *जिजाबाई शहाजीराजे भोसले*


   *जन्म : १२ जानेवारी १५९८*

(सिंदखेडराजा,बुलढाणा, महाराष्ट्र)


    *मृत्यू : १७ जून १६७४*

   (पाचड, रायगडचा पायथा)


वडील : लखुजीराव जाधव

आई : म्हाळसाबाई उर्फ 

           गिरिजाबाई

पती : शहाजीराजे भोसले

संतती : छत्रपती शिवाजीराजे भोसले, संभाजी शहाजी भोसले

राजघराणे : भोसले

चलन : होन

जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.


🔱 *भोसले व जाधवांचे वैर*

                   पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

                          या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.


🌀 *अपत्ये*

              जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

                     जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.


⚜ *मुलाचे संगोपन व राजकारभार*

              शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि  रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

                     शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.


🔮 *जीवन*

                 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

                   राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

              राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

                        शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

                 जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.


📚 *पुस्तके*

                  राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-


जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर

जेधे शकावली

शिवभारत

जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )

जिजाई : मंदा खापरे 

गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव

अग्निरेखा


🎞 *चित्रपट*

                  जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी राजांवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-


राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)

स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)


  

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

लालबहादूर शास्त्री


          

           *लालबहादूर शास्त्री*

        (भारताचे दुसरे पंतप्रधान)


*जन्म : २ ऑक्टोबर १९०४*

(मुगलसराई, भारत)

*मृत्यू : ११ जानेवारी १९६६*

(ताश्कंद)

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पत्नी : ललिता देवी

धर्म : हिंदू लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.

*दुसरे भारतीय पंतप्रधान कार्यकाळ*

जून ९, इ.स. १९६४ – जानेवारी १२ इ.स. १९६६

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : गुलजारी लाल नंदा

*तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

जून ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : सरदार स्वर्णसिंग

💁‍♂️ *जीवन*

       २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.

               वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.

           नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

🪔 *मृत्यूविषयी संशय*

      शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणती दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.

📚 *लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके*

                गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)

शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)

🏬 *लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था*

                      लालबहादुर शास्त्री झोपडपट्टी नं १, २, ३ : मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी

लालबहादुर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड -मुंबई) : जुने नाव - (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड

लालबहादुर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टाॅकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.

लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.

       

दोन शेळ्या



एक ओढा होता, त्याचे पाणी नितळ स्वच्छ होते. तो जोरात बाहन होता. तो आओस ओलांडून जाण्यासाठी त्या ओढ्यावर एक ऑडका होता.


एक पांढरी शेळी आली, तो ओडक्यावरून जाऊ लागली. समोरून एक काळी शेळी येत होती. दोघी समोरासमोर आल्या.


पांढरी शेळी काळ्या शेळीला म्हणाली, "ए काळे, बाजूला हो. मी आधी जाणार पांढऱ्या शेळीने "काळी" म्हटल्याबरोबर काळी शेळी भडकली. म्हणाली, "ए पांढरे, कोणाला काळी म्हणतोस. मी तुझ्यासारखी पांढऱ्या पायाची नाही. तूच बाजूला हो. मी आधी जाणार. मला घाई आहे."


काळ्या-पांढऱ्या रंगावरून दोघीत भांडण जुंपले. दोघींची टक्कर सुरू झाली.


पण ओंडका फारच लहान आहे, हे दोघींच्या लवकरच लक्षात आले. असेच भांडत राहिले, तर या अरुंद ओंडक्यावरून पाण्यात पडू आणि दोघीही पाण्यात बुडून मरून जाऊ.


म्हणून काळी शेळी म्हणाली, "ताई, मी खाली बसते. तू माझ्या पाठीवरून पुढे जा. मग मी जाईन."


पांढरी शेळी म्हणाली, "बरोबर आहे. तसेच करू या." काळी शेळी खाली बसली. तिच्या पाठीवरून पांढरी शेळी पलीकडे गेली. मग काळी शेळी उठली.


आणि दोघींनी सुखरूपपणे ओढा ओलांडला.


समजूतदारपणामुळे दोघींनी एकमेकींना मदत केली. म्हणून दोघीही वाचल्या.



 तात्पर्य - समजूतदारपणे एकमेकांना मदत करावी.  वादविवाद टाळावेत.


मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

लीडर Leader

 *🌳💐"लिडर" (नेतृत्व) कसा असावा...??🌳🌻💐🌹🙏*


🏆💐 *"लीडर(नेतृत्व) जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात."* 


 *💐"लीडर"(नेतृत्व) मध्ये हे खालील  गुण असणे आवश्यक आहेत.*🙏


 *💐१) दूरदृष्टी (Vision) :--* 

*लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्या वातावरणातूनच तो कार्यकर्त्यांच्या हातून कार्य घडवून घेत असतो.*


*💐२) ध्येयनिश्चिती (Goals):* 

*लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत. त्या ध्येय निश्चितीनुसारच प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे.*


*💐३) आत्मविश्वास*

 *(Self Confidence) :--*

*संघटनेच्या ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. आणि त्यातच खरा विजय असतो.*


*💐४) अनुशासन (Discipline):--*

*एक चांगला लीडर, एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट मीच एकटा करतो अशी भावना नसावी. स्वतः नियमांचे पालन करणे गरजेचे असते.*


*💐५) चिकाटी (Persistance):--*

*कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते. खचून न जाता एकाग्रतेने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. आणि यावरूनच लिडरची कार्यक्षमता लक्षात येते.*


*💐६) नियोजन (Planning):--*

*नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जबाबदारी पार पाडावी.*


*💐७) योग्य निर्णय* 

*(Proper Judgement):--*

*लीडरला सर्वांची बाजू ऐकून , सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे. मी करतो तेच बरोबर  असा विचार असू नये.*


*💐८) धैर्य (Patience):--*

*नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी अमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते. घेतलेओअ निर्णय बरोबरच असल्याचे कार्यकर्त्यांना पटवून देणे आवश्यक असते.*


*💐९) जबाबदारी * *(Accept Responsibilities):--*

*नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. नेतृत्व स्वीकारणे म्हणजे यश-अपयश दोन्ही स्वीकारणे.*


*💐१०) बदलाचा स्वीकार* *(Accept  changes):--*

*बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना , आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे.*


*💐११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा*

*(Be A Coach & Guide):--*

*प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे. प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे. लिडरला सर्व प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे.*


*💐१२) आकर्षक व्यक्तिमत्व* *(Pleasing Personality):--*

*एक लीडर म्हणून तुमच्यावर , तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद राखायला पाहिजे.*


*💐१३) प्रशासनिक कौशल्य* *(Administrative skills):--*

*एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. सर्व प्रशासकीय बाब म्हणजे पत्रव्यवहार आणि त्यातील मजकुरावर लिडरची पत समजते. प्रशासनाचे ज्ञान आत्यावश्यक आहे.*


*💐१४) संभाषण कौशल्य* *(Communication skills):*

 *एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे ध्यैर्य, भाषा, संभाषण, विचार प्रभाव, आवाज कौशल्याची क्षमता. सहका-यांना काही गोष्टी पटवून देणे महत्त्वाचे असते.*


*💐१५) निर्णय घेण्याची कला*

*(Decision making ability):--*

 *एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार निर्णय घेणार नाही व वरिष्ठांच्या मर्जीसाठी चापूलुसी करून निर्णय घेणारा नसावा.*


*💐१६) जोखीम घेण्याची क्षमता* 

*(Risk Taking Ability):*

*नेतृत्व करताना धैर्याबरोबरच महत्वाचा जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे.*


*💐१७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक* 

*(Creativity and Innovation):*

 *हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते.*


*💐१८) समस्या सोडविण्याचे कौशल्य* 

*(Problem solving skills):--*

*खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच त्याची बुद्धिचातुर्य लक्षात येते.*


*💐१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता* 

*(Flexibility And Adaptability):*

*लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे. शक्यतो शांत राहणे. साधी राहणी आणि उच्च विचारसारणी असावी.*


*💐२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य* 

*(Time Management Skills):--*

*लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे. स्वतः वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे.*


*💐२१) लोकांना प्रोत्साहित करा* 

*( Motivate People):--*

*लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी विविध योजना आखाव्यात. कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी अधूनमधून कार्यक्रम ठेवावे.*


*💐२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.* 

*(Lead By Example):--*

*कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.*


*💐२३) टीम प्लेयर्स व्हा*

*( Be Team Players):--*

*लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.*


*💐२४) त्यागशील* *(Sacrificial) :--*

*लीडर हा त्यागशील असावा.स्वतः त्यागाची भावना ठेवून कार्यकर्त्या समोर आदर्श ठेवावा.नेहमी इतरांना संधी देणारा खरा लीडर असतो. इतरांची संधी हिसकावून घेणारा कधीच खरा स्वार्थी लीडर होऊ शकत नाही.*


*💐२५) अपयशाचा स्वीकार* *(Acceptance of failure) :--*

*यश सर्वांचे तर अपयश फक्त माझे अशा विचाराचा लीडर असावा.*


*💐२६) सामूहिक हीत* *(Collective interest) :--* *लीडरने स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करून संघटनेचे हीत लक्षात घेऊन ध्येय, धोरण निश्चित केले पाहिजे.*


*💐२७) निःस्वार्थी (Selfless) :--* *लीडर स्वार्थी आपमतलबी व कौतुकाचा भोक्ता नसावा.*


*२८) इतरांना सन्मान देणारा* *(Respectful of others) :--* *लीडरने नेहमीच सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा व लोकांचा सन्मान केला पाहिजे. स्वतः उच्च पदावर काम करताना इतरांना आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे.*


*💐२९) लोकसंग्रह, समभाव, सत्कार्य :----* 

*लिडरने लोकांचा संग्रह करून त्यांच्यामध्ये समानतेची भावना निर्माण करून आणि मग त्यांच्या हातून सत्कार्य घडविले पाहिजे. धन्यवाद...!!*


*💐आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा  आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 


*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व  समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*                 


*आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा.*


*एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*


🌹🪔🌻🌹🪔🙏🌻🌹🪔🌻🌹

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

SET EXAM 2024

 




#SET EXAM 2024* 

         *सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी ; जाणून घ्या सेट परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके*

           *★ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे आयोजित ३९ व्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.*

*★ सेट परीक्षेची तारीख: रविवार, दि. ०७ एप्रिल, २०२४* 

*★ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत १२ जानेवारी, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२४*

*★ विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत ०१ फेब्रुवारी, २०२४ ते ०७ फेब्रुवारी, २०२४*

*★ सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन अर्ज, परीक्षेचा अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) दि. १२-०१-२०२४ पासून उपलब्ध होईल.*

*★ ऑफलाईन होणारी शेवटची सेट  परीक्षा, 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाइन होणार आहे.*

       *NET/SET/PET संदर्भ पुस्तके*

     *सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ*   

          सेट परीक्षेतील पेपर पहिला हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट/सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.  

*(1)नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते - नववी आवृत्ती (मुद्देसूद, परीक्षाभिमुख व Mind Map द्वारे मांडणी व घटकनिहाय महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न )*

(2)नेट अध्यापन एवं शोध अभियोग्यता - के.वी.एस मदान (हिंदी व इंग्रजी माध्यम)

(3)पर्यावरण - एरीक भरुचा

(4)सामाजिक संशोधन पद्धती- डॉ.प्रदीप आगलावे

(5)PET संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती) (पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

(6)बुद्धिमत्ता चाचणी - के'सागर/सचिन ढवळे/अनिल अंकलगी/फिरोज पठाण

       *सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*

     नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.

        *सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*

(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham

(2) A history of english literature -  e Albert

(3) English literature  - R j Rees

(4) a background to the english literature - B Prasad

(5) English literature -  Elizabeth drabble

(6) History of indian english literature - m k naik 

(7) beginning theory - Peter Berry        

(8)A critical history of english literature - David daiches  


        *सेट परीक्षा मराठी पेपर 2  संदर्भ*   

(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर

(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे

(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद

(4)अनिवार्य मराठी - के सागर

(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग

(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे

(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक

           *सेट परीक्षा हिंदी पेपर 2  संदर्भ*

(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल

(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा

(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ

(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा

(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह

(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह

(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के

(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख

(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह

(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन

         *सेट परीक्षा इतिहास पेपर 2   संदर्भ*

(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा

(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र

(3)आधुनिक  भारत- बिपीन चंद्र

(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर

(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.

(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड

(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक

(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर

(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे

(12)महाराष्ट्राचा इतिहास- 

डॉ गाठाळ


         *सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ*

(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ

(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ

(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन

(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध

(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते

(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब

(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित

(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन

(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी

(10)मानवी भूगोल -  मजीद हुसेन

(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे

(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

लोकप्रिय पोस्ट