blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

Cast validity जात वैधता प्रमाणपत्र

विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने  cast validity या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचे वेध लागतात. या प्रवेशांसाठी आणि त्यातील विविध आरक्षण आणि सवलती मिळवण्याच्या हेतूने विद्यार्थी आणि पालकांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु होते. पण, शासनाकडून विविध प्रमाणपत्र मिळवणायसाठी (Caste Validity Certificate) एकाचवेळी उडणार्‍या गर्दीमुळे अनेकदा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची पूर्तता करणे शासनालाही शक्य होत नाही. मात्र, आता ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत-कमी दिवसांमध्ये अगदी त्वरीत दाखले मिळत आहेत.दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे. 



विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे


विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता, जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आता विद्यार्थी बार्टीच्या वेबसाईटला भेट देऊन जात वैधता प्रमाणपत्र करिता अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळेचा पुरावा नसेल तरी असे विद्यार्थी आता उत्पन्नाचा पुरावा सादर करून बार्टीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित समिती आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. एवढेच नव्हे तर, एखाद्या विद्यार्थ्याला जर खूपच गरज असेल तर एका दिवसात देखील समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.


याकरिता समितीने माहिती देताना असे सांगितले आहे की; “विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी करून कॉलेजमधील जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्र घेऊन समितीकडे जाऊन जात वैधता प्रमाणपत्र करिता ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही किंवा तो नाकारला जाणार नाही याची काळजी समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.