blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

डोळे आणि अश्रू

अश्रूंची  रूपे

अश्रू म्हणजे डोळ्यांतून येणारे पाणी हे पाणी काही वेळेला शरीर आणि मनाला दुःख झाल्यामुळे येते किंवा काही वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त आनंद झाला तरीही येते. यावरूनच डोळ्यांतून येणाऱ्या या पाण्याला दुःखाश्रू किंवा आनंदाश्रू म्हणतात. ज्या वेळी सहन न करता येण्यासारख्या शारीरिक वेदना होतात, मग त्या

आंतरिक असोत की बाह्य भागावरच्या असोत. अशा वेळी माणसाची सहनशक्ती संपते. मग त्याला होणाऱ्या दु:खामुळे त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागते. यालाच आपण दु:खाश्रू म्हणतो. शरीरावर होणारी मोठी जखम, भाजणे, शरीराचा एखादा अवयव आपटला जाणे, मुरगळणे किंवा डोके पोट दुखणे या वेदना जर काहीशा जास्त असतील तर त्या होणान्या त्रासाने डोळ्यांतून येणारे पाणी हे दुःखाश्रू होत. तसेच मनाविरुद्ध काही घडतात, भयंकर अपमान होतो, फार मोठा अपेक्षाभंग होतो. अशा वेळी सहनशक्ती संपून डोळ्यांतून पाणी येते. हेही दुःखाश्रूच असतात.

याउलट एखाद्या वेळी अपेक्षेपेक्षा फार मोठे यश मिळते, अत्यंत आवडती व्यक्ती खूप दिवसांनी भेटते. अशासारख्या कमालीच्या आनंद देणान्या घटना जर घडल्या तर त्यामुळे होणारा आनंद आपण सहन करू शकत नाही. अशा वेळी ही आपली सहनशक्ती संपते आणि आपल्या डोळ्यांतून पाणी येऊ लागते. याला आपण आनंदाश्रू म्हणतो.

साधारणतः लहान मुलांची सहनशक्ती कमी असल्यामुळे त्यांना शारीरिक अथवा मानसिक जो त्रास होतो त्या त्रासामुळे ती मुले रडायला लागतात. परंतु अशा छोट्या दु:खामुळे मोठी माणसे अश्रू ढाळीत नाहीत. याचे कारण त्यांची सहनशक्ती मुलांपेक्षा वाढलेली असते. याउलट आनंदाश्रूंचे प्रमाण लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांत जास्त आढळते. काही वेळेला असेही आढळते की, एकाच परिस्थितीत दोन भिन्न स्वभावाची माणसे सापडली तर त्यातील एक व्यक्ती रडत बसते व एक शांतपणे बसून राहते. हा त्यांच्यातील सहनशक्तीच्या फरकाचा परिणाम आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हळव्या मनाच्या असतात.

काही लबाड माणसे या दुःखाश्रूंचा गैरवापर करून दुसन्या व्यक्तींची सहानुभूती मिळतवतात व आपला स्वार्थ साधतात, अशी माणसे ढोंगी असतात. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यांना नका म्हणतात.

आनंदाश्रू काय किंवा दुःखाश्रू काय ही दोन्हीही अश्रूंचीच रूपे आहेत. काही आळेला माणसांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटण्यासाठीही अश्रूंचा उपयोग होतो. परंतु काही माणसे मात्र खूपच सहनशील असतात. ती माणसे आपले अश्रू सहसा येऊ देत नाहीत. येईल त्या परिस्थितीला ते खंबीरपणे तोंड देतात, पण डोळ्यांतून पाणी काढीत नाहीत अशी आहेत ही अश्रूंची दोन रूपे

केल्याने होत आहे रे

केल्याने होत आहे रे 

संत रामदासांनी कृतीशीलतेचे महत्त्व वरील श्लोकाद्वारे सांगितले आहे. कोणतीही गोष्ट ठरविल्याशिवाय, निश्चित केल्याशिवाय होऊ शकत नाही. "केल्याने होत आहे रे, आघि केलेची पाहिजे" म्हणजे तुम्ही नुसते विचार करीत बसू नका, कार्यप्रवण व्हा; प्रारंभ करा म्हणजे कार्य सिद्धीस जाईल, तडीस जाईल..

परंतु काहीही कृती न करता नुसते झाले पाहिजे असे म्हणत राहिलात तर ती दिवास्वप्ने ठरतील तुमच्या मनातील कार्यप्रवणतेचे रसायन सतत उकळत पहिले पाहिजे, तुम्हाला मोठे व्हायचे आहे. यशस्वी व्हायचे आहे हा विचार मनात येणे व त्यासाठी प्रयत्नांची सुरुवात करणे, सतत पाठपुरावा करणे, सराव करणे, पहिल्या चुका टाळणे, पुन्हा त्या होणार नाहीत असा कटाक्ष ठेवणे याने यशाकडे तुमची वाटचाल सुरू होईल. या प्रयत्नातून तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल. यश दृष्टिपथात आले, मिळायला लागले, मिळाले की अपार आनंद होईल परंतु याचे बीज असे असे घडावे हा विचार तुमच्या मनात येण्याने व तसे घडावे म्हणून प्रयत्न करण्यानेच होईल

यशस्वी होण्यासाठी, सिद्धीसाठी प्रार्थना हवी पण ती प्रार्थना यशस्वी होण्यासाठी तिला प्रयत्नांची जोड हवी. प्रसिद्ध कलावंत, गायक, नट, चित्रकार, वादक, क्रीडापटू है एकाएकी मोठे झालेले नसतात, त्यामागे असते त्यांनी केलेली अपार साधना, केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट !!

सुंदर वस्तू, चांगली गोष्ट एका दिवसात तयार होत नाही. ताजमहाल या अद्वितीय इमारतीचे बांधकाम २२ वर्षे सुरू होते, वेरूळचे कैलास लेणे अनेक वर्षे खोदले जात होते. या सर्वांमागे असते ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा !! निर्मिती मागील प्रेरणा, ऊर्मी, निर्मिती करण्याची इच्छा हा ऊर्जास्रोत महत्त्वाचा आहे. कुठलीही महत्त्वाकाक्षा उराशी बाळगून तिच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे यशाला गवसणी घालण्यासारखे आहे. नंत रामदासांनी "केल्याने होत आहेरे, आधि केलेची पाहिजे" या दिलेल्या बीजमंत्राचे अनुसरण करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.