blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शिक्षक कोणाचा

 *शिक्षकांकडे उपद्रवमूल्य नसते आणि तातडीने दिसून येणारे उपयुक्ततामूल्यही नसते.इथेच सारी गडबड झालेली आहे.*

    

एकवेळ लोक इतर सरकारी बाबूंना नमस्कार करतील पण उठूनसुटून शिक्षकांना सतत अक्कल शिकवायला कमी करणार नाहीत. त्यांच्या पगारावर बोट ठेवतील. 

*सरकारी शाळा ही कुणालाही कधीही येऊन राग व्यक्त करण्याची चांगली सोय असते. शिक्षक उलट उत्तरं करत नाहीत, सरकारी नोकर आणि सुशिक्षित मनुष्य म्हणून काही मर्यादा पाळाव्या लागतात, त्या ते पाळत राहतात. त्यामुळे शिक्षक हे सॉफ्ट टार्गेट वाटतात समाजाला.* 

शिक्षण आणि बालमानसशास्त्राबद्दल काही कळो अथवा ना कळो, त्यावर भाष्य करणं फार सोपं असतं कुणाहीसाठी.ऐकून घेतल्याने नुकसान शिक्षकांचं होत नाही. पण जेव्हा शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, त्याचा परिणाम समोरच्या विद्यार्थ्यांवर होत असतो हे मात्र नक्की.

अहो, नुसता उचलला खडू आणि लावला फळ्याला, म्हणजे झालं शिकवणं असं नसतं!

*मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्षे शिक्षक सुद्धा काही नवनवीन गोष्टी शिकत असतात. शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो, मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो, त्यामुळे वर्गातल्या सर्व मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही.* 

बराच काळ एकमेकांसोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं, मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात.

*झाडावरच्या सर्व कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत, तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाचवेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहिती असतं. एकाच वर्गात राहूनही मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोब्बर कळतं.*

मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकाशी बोलतात, आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीने घडू शकतील याचा चांगला अंदाज असतो शिक्षकाला. 

हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात, मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. माणसं असतात ती जितीजागती, माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येकजण वेगळ्या तऱ्हेने घडतो.

या सगळया गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं, त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिकच आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. मोबाईलला जशी चार्जिंग लागते, तशी बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींना विश्रांतीची गरज असते. अगदी नैसर्गिक आहे ते.

*इतर कोणत्याही सरकारी ऑफिसात तुम्ही जाता तेव्हा संबंधित कर्मचारी टेबलवर नसला तरी तुम्ही त्याला अरेरावीची भाषा करत नाही, आपलं काम होईपर्यंत गोड बोललं पाहिजे हे धोरण तुम्ही ठेवता. शिक्षक मात्र जरा पाचदहा मिनिटे इकडेतिकडे झाल्यावर कसं काय आभाळ कोसळतं? शिक्षकांना चोरांसारखी वागणूक का देतात लोक?*

शैक्षणिक कामांसोबत अगदी सुट्टीतसुद्धा अनेक अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून शासन करवून घेत असतं, त्याबद्दल पालकांना कल्पना सुद्धा नसते.

चालू तासिका डिस्टर्ब करून कधीकधी तातडीने कागदोपत्री माहिती शिक्षकांकडून मागवली जाते. नाही आवडत कुणालाच हातातलं शिकवण्याचं काम टाकून कागद खरडत बसायला, मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरत बसायला. असंख्य कसरती कराव्या लागतात शिक्षकाच्या नोकरीत.

*शिक्षक शाळांमध्ये शिकवतात म्हणजे त्यांच्याजवळ उच्चशिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव अशा तिन्ही गोष्टी असतात, नोकरीला लागणं एकवेळ सोपं असेल, पण शिक्षकाच्या नोकरीत टिकून राहणं ही सोपी गोष्ट नव्हे.नका उठसूट उपदेश करू शिक्षकांना, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्या पाल्याबाबत आपल्याला काही समस्या असतील तर शिक्षक आनंदाने संवाद साधायला तयार असतात. ते करा, स्वार्थी व्हा, आपल्या मुलांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी यासाठी हट्ट धरा शिक्षकांकडे, आपल्या मुलांचं कल्याण करून घेण्याचा तो छान मार्ग आहे.*

आपल्या पाल्याला आवर्जून विचारा, तुला तुझे शिक्षक आवडतात का, आवडत नसतील तर त्या शिक्षकांशी जरूर संपर्क साधा, त्यांच्या संबंधांत काय बिनसतं आहे हे समजून घ्या, त्यावर मार्ग काढा.

*मुलाला वर्गात करमत नसेल, शिक्षक आवडत नसतील तर खरोखरच गंभीर गोष्ट आहे ती.पण मुलं त्या शिक्षकासोबत आनंदी असतील, तर ठेवा ना विश्वास त्याच्यावर!*

आणि आपली मुलं शाळेत शिकत नसतील तर नका जाऊ शाळांमध्ये चौदा वेळेस डोकवायला, डिस्टर्ब होते तिथली व्यवस्था. दुसऱ्या कुणाच्या तरी मुलांचं नुकसान होतंच ना त्याने! *आपल्या गावची शाळा, तिची प्रगती झाली पाहिजे म्हणून अवश्य जा शाळेत, पण गेल्यावर भसकन वर्गात नका घुसू, मुलांचं लक्ष विचलित होतं.मुख्याध्यापकांशी चर्चा करा,त्यांच्याशी बोलून गोष्टी ठरवा, छानच आहे ते.*

गावात उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणं, आपल्या गावच्या शाळा आणि शिक्षकांचे हात बळकट करणं हे पुढे जाऊन आपल्याच गावाच्या फायद्याचं ठरतं.

*एखाद्या गावात फारच मानसिक त्रास झाला तर सरकारी शिक्षक बदली करून दुसरीकडे जातात, त्याने नुकसान त्या शिक्षकांचं होत नाही, मुलांचं होतं हे लक्षात घ्या.*

त्यात हा कोरोना कंबरडं मोडून गेलाय शिक्षण व्यवस्थेचं, सैरभैर झालंय सगळं. सर्वांनाच त्यातून सावरायचं आहे.

*पालकांनी मुलांसाठी थोडं स्वार्थी व्हायला हवं.* 


*म्हणजे कसं? तर आपल्या गावात आहे त्या शाळेला आणि शिक्षकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायला हवा, सामंजस्याने शाळेचा विकास करत त्यातून आपल्या गावचं शैक्षणिक वातावरण मजबूत करत रहायला हवं.*

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.