blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

महत्त्वाचे imp

   🙏 *सातत्याने 8 दिवस कोव्हिड वार्ड मधे थांबल्याने निरिक्षनातुन एका कोरोना पेशंटला सुचलेली एक समर्पक कविता*..🌹🙏👇👇👇

            *कोरोना* 

  


 *बरं झाल देवा*.....

      *मला कोरोना झाला* |

     *आयुष्याचा आलेला*,..

  *सगळा माज निघुन गेला* ||

        *म्हनीत होतो नेहमीच मी*,

 *माझी गाडी,आंन माझा बंगला* | *पन जवा बसलो आम्बुलन्समधी*

*आख्हा जीव उशाला टांगला* || 

*गाडी राहिली..बंगल्याम्होरं* ...

*आन रस्ता दिसेनासा झाला*,

    *बरं झाल देवा...मला कोरोना झाला*...|| 1

*प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी*

      *केली कर्म आठवत होती*..|

*प्रत्येक अडकनारया श्वासासंगे*,

*माणुसकीची जान साठवत होती*

..... *पुण्यसंचय आला संपत* ..

   *आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला*,|

*तेंव्हा कुठ..देवा..तुझ्यावर भरोसा आला*..|| 

   *बरं झाल देवा...मला कोरोना झाला*.......2

    *होती पैशांची मस्ती*..

  *आनं पदाचीबी गुरमी* |

 *सगळं संपल देवा आता*

*आलीया पुरती नरमी*..|| 

*जवा आता मिळालाय*,

*गरिबा शेजारी खाट*.| 

*तवाच माझा जिरलाय* |

*आता समदा थाट* || 

 *सगळ आठवुन आता* |

*जीव घाबरा झाला* || 

*बर झाल देवा...मला कोरोना झाला* ||| 3

  *नाही दिली कोणा गरिबा कधी*,

  *रुपया आणीक दमडी* ..|

*इथं  सुयांच्या भोकानी*,

*थकून गेलीया चमडी* || 

*पै-पै कमावलेला,पैसा ना कामी आला* | 

   *बर झाल देवा...मला कोरोना झाला* || 4

  *खर सांगतो...मित्रांनो आता*,

*पैसा,पद आणी खोटी प्रतिष्ठा*,

*यात काही दम नाही*......|

*कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त*,

*प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई* || 

*नात्यांमधील ऑक्सिजन कधी*,

*कमी होऊ देऊ नका* | 

*मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले*,

*बोट कधी सोडवु नका* || 

  

🙏🙏🙏 आवडल्यास शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद🙏🙏🙏

ताकद एकतेची

 Read definetly नक्की वाचा ...


आयुष्य जगायच कधी???????


*वय 20* वर्षे - आता शिक्षण चालू आहे .

*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.

*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.

*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत

*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.

*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.

*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.

*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. 

*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.

*65 वर्षे* -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.

*70 वर्ष*-- मेला.


17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी


अरेच्चा 

जगायचं राहूनच गेले … ! 

  

 तेंव्हा 

आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने ...


आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात

बाकी सर्व इथेच राहणार आहे .

झाडू,जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो *स्वतः"कचरा" होवून जातो.*

*त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*

मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .

मी विचारले *"काय भाव आहे ?*

त्यांनी सांगितले : *"60 रूपये किलो ."*

त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*

तो बोलला : *"20 रूपये किलो"*

मी विचारले :"इतका कमी भाव .? 

तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 

पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 

तेव्हा मला कळाले

जो व्यक्ती *संगठन...समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...🙏🏻🙏🏻 नक्की 🙏🙏

धागा

  एकदा अर्जुनाने कृष्णाला विचारले-

  •  माधव.. 

 'यशस्वी आयुष्य' म्हणजे काय? कृष्णाने अर्जुनाला पतंग उडवायला नेले. अर्जुन कृष्णाला काळजीपूर्वक पतंग उडवताना पाहत होता. थोड्या वेळाने अर्जुन म्हणाला- माधव.. या धाग्यामुळे पतंग मोकळेपणाने वरच्या दिशेने फिरू शकत नाही, तो तोडायचा का? उंचावर जाईल. 


कृष्णाने धागा तोडला.. पतंग अजून थोडा वर गेला आणि मग ओवाळत खाली आला आणि दूरच्या अज्ञात जागी पडला... 

मग कृष्णाने अर्जुनाला जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगितले. 


पार्थ.. 'आपण आयुष्यात ज्या उंचीवर आहोत.. आपल्याला अनेकदा असे वाटते की आपण ज्या काही गोष्टींशी बांधलेलो आहोत त्या आपल्याला उंच जाण्यापासून रोखत आहेत; 



-घर- -कुटुंब- -शिस्त- -आई वडील- -मास्टर-आणि- -समाज- आणि आम्हाला त्यांच्यापासून मुक्त व्हायचे आहे ... खरे तर हेच धागे आहेत - जे आपल्याला त्या उंचीवर नेऊन ठेवतात.


 'या धाग्यांशिवाय आपण एकदाच वर जाऊ, पण नंतर आपले तेच नशीब येईल जे धाग्याविना पतंगाचे झाले...


' "म्हणून, जर तुम्हाला आयुष्यात अव्वल स्थानावर राहायचे असेल, तर या धाग्यांशी तुमचे नाते कधीही तोडू नका."


 * धागा आणि पतंगासारख्या जोडणीच्या यशस्वी समतोलाने गाठलेल्या उंचीला

 'यशस्वी जीवन*..' असे म्हणतात. 

म्हणून धागे तोडू नका  जोडून ठेवा ...🙏🙏🙏🙏🙏


ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.